English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.

Advertisements
Advertisements

Question

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.

Short Answer
Advertisements

Solution

'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. रोगी माणसाला सुख, समाधान मिळू शकत नाही. त्याने कमावलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते. म्हणूनच, शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे. निरोगी शरीरसंपदेच्या बळावर आपण कितीही धन कमावू शकतो. आपले जीवन सुखी, समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय, म्हणूनच 'आरोग्यम् धनसंपदा' असे म्हटले जाते.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: व्यायामाचे महत्त्व - स्वाध्याय [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 व्यायामाचे महत्त्व
स्वाध्याय | Q ५. (इ) | Page 19

RELATED QUESTIONS

योग्य अर्थ शोधा.

आस लागणे म्हणजे ______.


संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पेरणीसाठी लागणारे बियाणे


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द
   

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×