English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.

Short Answer
Advertisements

Solution

'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. रोगी माणसाला सुख, समाधान मिळू शकत नाही. त्याने कमावलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते. म्हणूनच, शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे. निरोगी शरीरसंपदेच्या बळावर आपण कितीही धन कमावू शकतो. आपले जीवन सुखी, समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय, म्हणूनच 'आरोग्यम् धनसंपदा' असे म्हटले जाते.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: व्यायामाचे महत्त्व - स्वाध्याय [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 व्यायामाचे महत्त्व
स्वाध्याय | Q ५. (इ) | Page 19

RELATED QUESTIONS

योग्य अर्थ शोधा.

आस लागणे म्हणजे ______.


संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पेरणीसाठी लागणारे बियाणे


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द
   

‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×