English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा

Advertisements
Advertisements

Question

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.

१. चौकटी पूर्ण करा.

(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- 
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-

२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

१. (अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक- प्रकाश, सत्य व साधेपणा

(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- त्याग व नम्रता

(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक- हरितश्यामल भूमाता

२. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलात फडकू लागला. तिरंग्यात केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग आहेत. त्यांपैकी 'केशरी' रंग हा त्यागाचे व नम्रतेचे प्रतीक आहे. या देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या त्यागाचे ते स्मरण आहे. भारत ही साधूसंतांची भूमी आहे, म्हणूनही या केशरी रंगाचे महत्त्व आहे. त्यानंतर येणारा पांढरा रंग हा प्रकाश, सत्य व साधेपणाचे प्रतीक आहे. या रंगामुळे शांतता व पावित्र्याचे दर्शन घडते. या पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एक अशोकचक्र आहे. ते गतिमानता, सद्गुण व धर्माची खूण आहे. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय, सत्यमय राहून काम करायला हवे, असा संदेश ते देते.

तर हिरवा रंग हा हिरव्यागार, सस्यश्यामल भूमातेचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्याची समृद्धी, भरभराट दर्शवतो. अशाप्रकारे, या 'तिरंगा' ध्वजाखाली उभे राहून आपण सर्वांनी सेवावृत्तीने, कोणताही अहंकार मनी न बाळगता पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करूया, असा संदेश 'तिरंगा' सदैव देत असतो.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 12.1: पुन्हा एकदा - अपठित गद्य आकलन [Page 44]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 12.1 पुन्हा एकदा
अपठित गद्य आकलन | Q १. | Page 44

RELATED QUESTIONS

योग्य अर्थ शोधा.

वाटुली म्हणजे ______.


चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×