Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
१. (अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक- प्रकाश, सत्य व साधेपणा
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- त्याग व नम्रता
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक- हरितश्यामल भूमाता
२. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलात फडकू लागला. तिरंग्यात केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग आहेत. त्यांपैकी 'केशरी' रंग हा त्यागाचे व नम्रतेचे प्रतीक आहे. या देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या त्यागाचे ते स्मरण आहे. भारत ही साधूसंतांची भूमी आहे, म्हणूनही या केशरी रंगाचे महत्त्व आहे. त्यानंतर येणारा पांढरा रंग हा प्रकाश, सत्य व साधेपणाचे प्रतीक आहे. या रंगामुळे शांतता व पावित्र्याचे दर्शन घडते. या पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एक अशोकचक्र आहे. ते गतिमानता, सद्गुण व धर्माची खूण आहे. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय, सत्यमय राहून काम करायला हवे, असा संदेश ते देते.
तर हिरवा रंग हा हिरव्यागार, सस्यश्यामल भूमातेचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्याची समृद्धी, भरभराट दर्शवतो. अशाप्रकारे, या 'तिरंगा' ध्वजाखाली उभे राहून आपण सर्वांनी सेवावृत्तीने, कोणताही अहंकार मनी न बाळगता पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करूया, असा संदेश 'तिरंगा' सदैव देत असतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
चौकटी पूर्ण करा.

कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)

चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |
