हिंदी

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, वैचारिक बैठक घालून दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. भक्तीचा मार्ग सर्वांना मोकळा केला. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा या विषयांवर समाजाला आपल्या कृती व उक्तीतून मार्गदर्शन केले, सामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. यामुळे जात, धर्म यांची बंधने गळून पडली व स्त्री, शूद्र, दलित आणि अठरापगड जातींतील भक्तांची मंदियाळी तयार झाली. गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार यांसारख्या संतांनी स्वकर्म सांभाळून भक्ती केली. लोकांना आपल्या रोजच्या कर्मात भगवंत पाहण्याची शिकवण दिली. संत रामदासांनी स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी लोकांची मने घडवली.

संतांनी नेहमीच समाजातील सद्गुणांची पाठराखण करत वाईट वृत्तींचा नाश व्हावा यासाठी जनजागृती केली. आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे, हे समजावले. अशाप्रकारे, संतांनी समाजाची गरज जाणून कार्य केले, जे नेहमी समाजाकरता मार्गदर्शक ठरले.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.2 संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ५

संबंधित प्रश्न

‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


व्यायामाने जडत्व वाढते.


व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पेरणीसाठी लागणारे बियाणे


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×