हिंदी

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, वैचारिक बैठक घालून दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. भक्तीचा मार्ग सर्वांना मोकळा केला. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा या विषयांवर समाजाला आपल्या कृती व उक्तीतून मार्गदर्शन केले, सामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. यामुळे जात, धर्म यांची बंधने गळून पडली व स्त्री, शूद्र, दलित आणि अठरापगड जातींतील भक्तांची मंदियाळी तयार झाली. गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार यांसारख्या संतांनी स्वकर्म सांभाळून भक्ती केली. लोकांना आपल्या रोजच्या कर्मात भगवंत पाहण्याची शिकवण दिली. संत रामदासांनी स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी लोकांची मने घडवली.

संतांनी नेहमीच समाजातील सद्गुणांची पाठराखण करत वाईट वृत्तींचा नाश व्हावा यासाठी जनजागृती केली. आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे, हे समजावले. अशाप्रकारे, संतांनी समाजाची गरज जाणून कार्य केले, जे नेहमी समाजाकरता मार्गदर्शक ठरले.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.2 संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ५

संबंधित प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
(१) चकोर   चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२)   माहेरचे बोलावणे येणे  
(३) भुकेलेले बाळ    
(४)   पांडुरंगाची  

चौकटी पूर्ण करा.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.


‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×