मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, वैचारिक बैठक घालून दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. भक्तीचा मार्ग सर्वांना मोकळा केला. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा या विषयांवर समाजाला आपल्या कृती व उक्तीतून मार्गदर्शन केले, सामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. यामुळे जात, धर्म यांची बंधने गळून पडली व स्त्री, शूद्र, दलित आणि अठरापगड जातींतील भक्तांची मंदियाळी तयार झाली. गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार यांसारख्या संतांनी स्वकर्म सांभाळून भक्ती केली. लोकांना आपल्या रोजच्या कर्मात भगवंत पाहण्याची शिकवण दिली. संत रामदासांनी स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी लोकांची मने घडवली.

संतांनी नेहमीच समाजातील सद्गुणांची पाठराखण करत वाईट वृत्तींचा नाश व्हावा यासाठी जनजागृती केली. आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे, हे समजावले. अशाप्रकारे, संतांनी समाजाची गरज जाणून कार्य केले, जे नेहमी समाजाकरता मार्गदर्शक ठरले.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.2 संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ५

संबंधित प्रश्‍न

योग्य अर्थ शोधा.

वाटुली म्हणजे ______.


संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.


चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


चौकटी पूर्ण करा.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)

वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. पाया रचणे  
आवार रचणे  
खांब होणे  
कळस चढवणे  

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द
   

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×