मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, वैचारिक बैठक घालून दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. भक्तीचा मार्ग सर्वांना मोकळा केला. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा या विषयांवर समाजाला आपल्या कृती व उक्तीतून मार्गदर्शन केले, सामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. यामुळे जात, धर्म यांची बंधने गळून पडली व स्त्री, शूद्र, दलित आणि अठरापगड जातींतील भक्तांची मंदियाळी तयार झाली. गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार यांसारख्या संतांनी स्वकर्म सांभाळून भक्ती केली. लोकांना आपल्या रोजच्या कर्मात भगवंत पाहण्याची शिकवण दिली. संत रामदासांनी स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी लोकांची मने घडवली.

संतांनी नेहमीच समाजातील सद्गुणांची पाठराखण करत वाईट वृत्तींचा नाश व्हावा यासाठी जनजागृती केली. आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे, हे समजावले. अशाप्रकारे, संतांनी समाजाची गरज जाणून कार्य केले, जे नेहमी समाजाकरता मार्गदर्शक ठरले.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.2 संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ५

संबंधित प्रश्‍न

‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

स्वतःची कामे स्वतः करणारा - 


व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पेरणीसाठी लागणारे बियाणे


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×