मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची तीव्र ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांची वाट पाहणाऱ्या चकोराचा, दिवाळीची वाट पाहणाऱ्या लेकीचा, भुकेसाठी व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत देतात. या सर्व दृष्टांतांपैकी मला भुकेने व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत फार आवडतो.

लहान लेकरू आपल्या सर्व गरजांसाठी आईवरच अवलंबून असते. त्याला भुकेची जाणीव झाली, की ते जोरजोरात रडू लागते. रडून रडून गोंधळ घालते. आपल्या आईच्या प्रेमळ स्पर्शासाठी, दुधासाठी ते आसुसलेले असते. तिची वाट पाहत असते. ही जी भुकेल्या लेकराची आईसाठीची ओढ आहे तशीच तुकाराम महाराजांनाही आपल्या विठूमाऊलीच्या भेटीची ओढ वाटत आहे. अशाप्रकारे, आई व लेकराच्या नात्याद्वारे आपल्या मनातील विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करणारा संत तुकारामांचा हा दृष्टांत मला फार आवडतो.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ३

संबंधित प्रश्‍न

‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)

वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. पाया रचणे  
आवार रचणे  
खांब होणे  
कळस चढवणे  

व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×