मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

‘भेटीलागी जीवा’ या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांकरता आसुसलेल्या चकोराचा दृष्टांत देतात.

चकोर पौर्णिमेच्या चंद्राची खूप वाट पाहतो. जणू पौर्णिमेचे चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते, त्याला चंद्रप्रकाश आपल्या रोमारोमांत भरून घेण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागते, तसेच विठ्ठल माऊलीचे दर्शन व्हावे यासाठी तुकाराम महाराजदेखील रात्रंदिवस वाट पाहत आहेत. अशाप्रकारे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम आपली प्रभुदर्शनाची व्याकुळता व्यक्त करतात.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ ३

संबंधित प्रश्‍न

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.

१. चौकटी पूर्ण करा.

(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- 
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-

२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×