Advertisements
Advertisements
प्रश्न
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
Advertisements
उत्तर
राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांनी 'व्यायामाचे महत्त्व' या कवितेत मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
व्यायाम केल्याने अंगातील आळस दूर होतो. अंगी उत्साह संचारतो. पचनशक्ती सुधारते व रक्ताभिसरण संस्था उत्तमप्रकारे कार्य करू लागते. शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. माणसाचे आयुष्य वाढते. कफ, पित्त, वात इत्यादी विकारांचा नाश होतो. रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. विचारशक्ती वाढते. म्हणजेच, सुदृढ शरीरासोबतच मानसिक, बौद्धिक आरोग्यही सुधारते.
तसेच, व्यायाम करण्यामुळे स्वत:चे काम स्वत:च करण्याची स्वावलंबी वृत्ती निर्माण होते. कोणतेही काम करण्यासाठी शरीर व मन तितकेच उत्साही असते, म्हणूनच 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।' असे कवी म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
| अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
| (१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
| (२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
| (३) | भुकेलेले बाळ | ||
| (४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.

कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वीज चमकणे |
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वारा घुमणे |
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
| वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
