Advertisements
Advertisements
Question
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
Advertisements
Solution
राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांनी 'व्यायामाचे महत्त्व' या कवितेत मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
व्यायाम केल्याने अंगातील आळस दूर होतो. अंगी उत्साह संचारतो. पचनशक्ती सुधारते व रक्ताभिसरण संस्था उत्तमप्रकारे कार्य करू लागते. शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. माणसाचे आयुष्य वाढते. कफ, पित्त, वात इत्यादी विकारांचा नाश होतो. रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. विचारशक्ती वाढते. म्हणजेच, सुदृढ शरीरासोबतच मानसिक, बौद्धिक आरोग्यही सुधारते.
तसेच, व्यायाम करण्यामुळे स्वत:चे काम स्वत:च करण्याची स्वावलंबी वृत्ती निर्माण होते. कोणतेही काम करण्यासाठी शरीर व मन तितकेच उत्साही असते, म्हणूनच 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।' असे कवी म्हणतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
| वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
| आवार रचणे | ||
| खांब होणे | ||
| कळस चढवणे |
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
व्यायामाने जडत्व वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पेरणीसाठी लागणारे बियाणे
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
| वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
