Advertisements
Advertisements
प्रश्न
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
‘संतकृपा झाली’ या अभंगात संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या उभारणीतील संत ज्ञानेश्वरांचे योगदान वर्णन केले आहे.
संतांच्या कृपेमुळे वारकरी संप्रदायरूपी इमारतीची जडणघडण झाली. संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला वैचारिक, आध्यात्मिक व तात्त्विक बैठक दिली. समाजातील सर्व घटकांना समतेने वागण्याची शिकवण देऊन एकाच छताखाली आणले. ‘ज्ञानेश्वरी’, ‘हरिपाठ’, ‘अमृतानुभव’ या ग्रंथांची रचना करून ज्ञानाची कवाडे सर्वदूर खुली केली. सर्वसामान्य लोकांना भक्ती करण्याचा, ज्ञान घेण्याचा अधिकार मिळवून दिला. अशाप्रकारे, ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायरूपी देवालयाची भक्कम पायाभरणी केली. या बळकट पायामुळेच संपूर्ण देवालयाचा डोलारा त्याच्यावर उभारला गेला, असे प्रस्तुत ओळीद्वारे बहिणाबाई सांगत आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चौकटी पूर्ण करा.

कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
| वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
| आवार रचणे | ||
| खांब होणे | ||
| कळस चढवणे |
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वीज चमकणे |
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
| वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
