Advertisements
Advertisements
प्रश्न
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी प्रस्तुत कवितेत निसर्गाच्या विविध प्रतीकांतून नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे दर्शन घडवले आहे. कवयित्रीला वाटते, की पुन्हा एकदा आकाशातील विजेसारखा सळसळता उत्साह माणसात संचारावा आणि त्याच्या हातून नवनिर्माणाचे कार्य व्हावे. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी जशा मातीला चिंब भिजवून तिच्याशी एकरूप होतात, तसेच माणसाने समाजातील भेदभाव, असमानता विसरून एकोप्याने राहिले पाहिजे. बदलाचे जोरदार वारे वाहून इथला युवकवर्ग त्यांनी भारून गेला पाहिजे व त्याने आपली तहानभूक हरपून नवनिर्माणाचा ध्यास घेतला पाहिजे, ज्यामुळे आपल्या भारत देशाचे नाव साऱ्या विश्वात गाजेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
| अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
| (१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
| (२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
| (३) | भुकेलेले बाळ | ||
| (४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
| वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
| आवार रचणे | ||
| खांब होणे | ||
| कळस चढवणे |
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.

व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वीज चमकणे |
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वारा घुमणे |
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
