हिंदी

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. रोगी माणसाला सुख, समाधान मिळू शकत नाही. त्याने कमावलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते. म्हणूनच, शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे. निरोगी शरीरसंपदेच्या बळावर आपण कितीही धन कमावू शकतो. आपले जीवन सुखी, समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय, म्हणूनच 'आरोग्यम् धनसंपदा' असे म्हटले जाते.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: व्यायामाचे महत्त्व - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 व्यायामाचे महत्त्व
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ १९

संबंधित प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
(१) चकोर   चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२)   माहेरचे बोलावणे येणे  
(३) भुकेलेले बाळ    
(४)   पांडुरंगाची  

योग्य अर्थ शोधा.

वाटुली म्हणजे ______.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×