Advertisements
Advertisements
प्रश्न
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
वरील ओळ सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या 'तिफन' या कवितेतील आहे. या कवितेत कवीने कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनाचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे केले आहे.
पावसाची आस लावून बसलेला, शेतात राबणारा शेतकरी पाऊस सुरू होतो तसा मनातून सुखावतो. पाऊस पडल्यामुळे त्याच्या कष्टांचे चीज होणार असते आणि हिरवेगार पीक शेतात डोलू लागणार असते. त्यामुळे शेतीकाम करताना अचानक पायात काटा रुतून रक्त जरी आले तरी त्या वेदना त्याला जाणवत नाहीत. अशाप्रकारे, शेतकऱ्याचे जीवन कष्टमय असले तरी शेतकऱ्याच्या मनात मात्र हिरव्यागार शेताची आशा जागी झालेली असते. त्याने केलेल्या अपार मेहनतीतून हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात येणार, सारं काही ठीक होणार याची त्याला खात्री वाटत असते. त्यामुळे त्या कष्टांची, वेदनांची जाणीव त्याला राहत नाही, हे कवी यातून सांगत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने जडत्व वाढते.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वारा घुमणे |
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
