हिंदी

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. माझा आवडता खेळाडू - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

माझा आवडता खेळाडू

आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. कब्बडी, क्रिकेट, हॉकी, हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन इत्यादी अनेक खेळ लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. या खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी अनेक कुशल खेळाडू निवडले जातात. या सर्व खेळांपैकी माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. व सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन विराट कोहली माझे आवडता खेळाडू आहेत. मला विराट कोहलीचा खेळ खूप आवडतो. विराट कोहली भारतीय क्रिकेट टीमचे महान खेळाडू आहेत. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या कौशल्याने ते सर्वांचे मन मोहून घेतात. 

विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील प्रेम कोहली हे एक वकील व त्यांची आई सरोज कोहली या गृहिणी आहेत. त्यांना एक मोठा भाऊ व बहीण आहेत. विराट कोहली यांच्यात लहानपणा पासूनच क्रिकेट विषयी आवड होती. लहान असताना त्यांच्या वडिलांनी आणून दिलेल्या खेळण्यामध्ये त्यांना बॅट ही सर्वात प्रिय होती. 

2006 साली अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघात त्यांना शामिल करण्यात आले. 2008 साली त्यांनी एकोणीस वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारताला विश्वचषक जिंकून दिला. 2011 पासून त्यांनी टेस्ट क्रिकेट मॅच खेळणे सुरू केले. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाच्या तीनही फॉरमॅटचे कॅप्टन आहेत. 

2014 ते 2016 या दरम्यान विराट दोनदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवल्याबद्दल अर्जुन पुरस्कार आणि भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विराट कोहली उजव्या हाताने बॅटिंग व बॉलिंग करतात. विराट कोहली त्यांच्या फिटनेसमुळे सुद्धा लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ते दररोज व्यायाम करतात व आपल्या व्यायामाची फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकीत असतात.

मला विराट कोहलीचा जीवन प्रवास आणि खेळाबद्दलचा प्रामाणिकपणा पाहून खेळाडू व्हावेसे वाटते. त्यांच्या खेळाबद्दल असणाऱ्या जिद्दीमुळेच ते माझे आवडते खेळाडू आहेत.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


नमुना कृती.


नमुना कृती:


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


आदर्श विद्यालय, कोल्हापूर
‘मराठी भाषा दिन’ सोहळा

दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता

  • काव्यवाचन
  • कथाकथन
  • नाट्यप्रयोग
  • गीतगायन

विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी.

वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×