Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

Advertisements
उत्तर
सुसंवाद काळाची गरज
सर्वसामान्य माणसाला आपल्या घरात, कुटुंबात शांतता, तणावरहित वातावरण मिळालं तर तो आनंदी राहतो. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या आहेत; मात्र यांच्याबरोबरीने काही भावनिक गरजाही त्याला जगण्यास उपयुक्त ठरतात. माणसांच्या गर्दीतही माणूस कुठेतरी एकटा पडत आहे. हे एकटेपण सहन न झाल्याने विचित्र वागणारी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतात. मुळातच माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला आपल्या भावना व्यक्त करणे आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणे आवडते. याकरता महत्त्वाचा ठरतो तो संवाद. संवाद हा सुसंवाद असेल, तर माणसाचे माणूस म्हणून जगणे सुसह्य आणि आनंदी होऊन जाते.
ऐकणं हृदयापासून व्हायला हवं. बोलणाऱ्याशी ऐकणाऱ्यानं जोडलं जायला हवं. एकमेकांशी बोलणे म्हणजे सुसंवाद नव्हे. मनापासून साधलेला आणि मनापर्यंत पोहोचलेला संवाद म्हणजे सुसंवाद. आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला हा सुसंवाद साधणे आवश्यक असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. कुटुंबाला वेळ देता येत नाही. कामाचा व्याप, सततची धावपळ यांमध्ये माणूस अशाप्रकारे गुरफटून जातो, की घरात असूनही घरात काय चालू आहे याचे भान त्याला नसते. त्यात आपल्या वागण्यावर लक्ष ठेवून असणारी वडीलधारी मंडळी कुटुंबव्यवस्थेतून बाहेर पडल्यामुळे एकटेपणाचे ओझे आपल्यावर आल्यासारखे वाटते. आपल्यापेक्षा वेगळया मतांचा आदर राखून एखाद्या गोष्टीची चर्चा करणे म्हणजेच सुसंवाद साधणे ही कुटुंबाची गरज आहे.
सामान्यपणे मित्र-मैत्रिणींसोबत सुसंवाद साधणे सोपे जाते. आपल्याच वयाच्या, आपले विचार अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणारे मित्र-मैत्रिणी असतील, तर आपले मन मोकळे करायला हक्काचे माणूस सापडते. आपल्या मनात भावभावनांची, विचारांची दाटलेली गर्दी दाबून ठेवली, तर त्याचे मनावर दुष्परिणाम होतात. त्यासाठी आपला कोणाशी तरी सुसंवाद होणे आवश्यक असते.
श्रुतप्रज्ञ स्वामी म्हणतात की, बोलणं किंवा न बोलणं यापेक्षा तुम्ही काय ऐकता, ते किती हृदयापासून ऐकता, त्यावर प्रतिसाद कसा आणि कोणत्या शब्दात देता हे महत्त्वाचं असतं. 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.' हे मन आनंदी, स्थिर राहण्यासाठी सुसंवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. एखादी खोली झाडून स्वच्छ करावी त्याप्रमाणे मनातले विचार बोलून दाखवल्यावर मनही स्वच्छ झाल्यासारखे वाटते. एकटेपणाची भीती, हृदयावरील ताण, तणाव या गोष्टी माणसाला आत्महत्येकडे जाण्यास प्रवृत्त करतात. अशा धोक्यांपासून दूर राहण्यासाठी सुसंवाद साधला जाणे महत्त्वाचे ठरते.
जीवन समृद्धीचे रहस्य म्हणजे सुसंवाद होय. 'शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले' ही परिस्थिती शक्य नसली तरीही जे वाटते ते बोलता येत असेल, जे सांगू ते ऐकून घेणारी माणसे आपल्या आजूबाजूला असतील, तर जीवनाची गोडी अनुभवता येते. संवाद प्रेमाची अनुभूती देतात. या सुसंवादातून प्रेरणा मिळते, नाती जुळतात, आयुष्य स्थिर बनते. असा सुसंवाद साधला, की आपलं आयुष्यही अनमोल होतं.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
नमुना कृती:

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
| सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
| दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
| प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
|
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!

खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.

