Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

Advertisements
उत्तर
अन्नदाता शेतकरी मी
आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील ८०% लोकांचा उदरनिर्वाह शेती वर अवलंबून आहे. नमस्कार मंडळी. मी ह्या काळया आईचा लेक बोलतोय... मला वाटलं आज थोडं बोलावं तुमच्याशी. माझी आई म्हणजे माझी काळी माती. तिच्याशी आमचं अनेक पिढ्यांचं नातं. तिच्याच कुशीत जन्मलो, तिच्याच अंगाखांद्यांवर वाढलो, घाम गाळायला शिकलो, तिची सेवा केली आणि मग तिने भरभरून त्याचे फळ दिले. काळया आईची सेवा म्हणजे समस्त मानवजातीची सेवा, म्हणूनच तर मला अन्नदाता, उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते. पण, याचा काय फायदा? आमची दुखरी बाजूही तुम्हांला कळायला हवी. देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो.
कधी कोरडा दुष्काळ तर कधी भयंकर वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जातो. आमची सगळी भिस्त पावसावर. पावसाचा लहरीपणा आमच्या साऱ्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी करतो. पाऊस जास्त झाला, कमी झाला किंवा अवेळी झाला तरी प्रत्येकवेळी नुकसान आमचेच. तोंडाशी आलेला घास कधी कधी पावसामुळे हिसकावला जातो. घरात धनधान्य आले, की आपण काय काय करायचे ही स्वप्न आमची पोरंबाळं या बांधांवर बसून पाहतात. फार मोठी नसतात ओ ती स्वप्नं. पण उभं पीक जेव्हा समोर नष्ट होताना दिसतं, तेव्हा ही स्वप्नं अश्रूंमध्ये वाहताना दिसतात. ती स्वप्नं तरी आम्हांला पूर्ण करता यावीत एवढीच काय ती आमची अपेक्षा!
शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरली पाहिजे अशी सगळयांची ओरड आहे. होय, बरोबरच आहे. मलाही ते मान्य आहे; पण आम्हांला योग्य ते साहित्य, मार्गदर्शन नको का मिळायला? नवे तंत्र, नवे शोध तेव्हाच लागतील जेव्हा शेतीविषयक अभ्यासक्रम शाळांमधून शिकवले जातील. डॉक्टर, इंजिनिअरप्रमाणे विद्यार्थी 'मी आधुनिक शेतकरी बनणार' असे स्वप्न पाहतील.
नव्या संशोधनातून, वेगवेगळया साहित्यांच्या आधारे वातावरणातील बदल, ऋतूंमधील बदल, मातीचे परीक्षण, तिचे बदलते स्वरूप या साऱ्यांचा अभ्यास केला जाईल. यांवरच आमची आशा मातीशी नाते राखणारा आणि आपल्या मेहनतीने आभाळालाही गवसणी घालणारा शेतकरी लवकरच तुमच्या पिढीत अवतरेल अशी आशा आहे.
हमी भाव मिळत नसल्याने पिकलेला माल कवडीमोल किमतीला विकावा लागतो. कधी कधी असाच फेकूनही द्यावा लागतो. शेती करणे हे अजिबात सोपे काम नाही. अडते, दलाल आपल्या फायद्यासाठी आमचा उपयोग करून घेतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात आमच्या मागण्यांसाठी आम्हाला बंद, संप करावे लागतात. यासारखे दुर्दैव ते काय.
आर्थिक संकटात सापडलेल्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांसारखी वाईट अवस्था इतर कोणाचीही नसेल. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने योग्य त्या योजना राबवून पाठबळ दिले, तर आम्ही शेतकरी म्हणून ताठ मानेने जगू शकू.
एक गोष्ट मात्र नक्की, शेतकरी आहे म्हणून शेत आहे आणि शेत आहे म्हणून अन्न आहे आणि अन्न आहे म्हणून आपण जिवंत आहे, हे सर्व जग जिवंत आहे.
संबंधित प्रश्न

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.
