English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

Long Answer
Advertisements

Solution

अन्नदाता शेतकरी मी

आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील ८०% लोकांचा उदरनिर्वाह शेती वर अवलंबून आहे. नमस्कार मंडळी. मी ह्या काळया आईचा लेक बोलतोय... मला वाटलं आज थोडं बोलावं तुमच्याशी. माझी आई म्हणजे माझी काळी माती. तिच्याशी आमचं अनेक पिढ्यांचं नातं. तिच्याच कुशीत जन्मलो, तिच्याच अंगाखांद्यांवर वाढलो, घाम गाळायला शिकलो, तिची सेवा केली आणि मग तिने भरभरून त्याचे फळ दिले. काळया आईची सेवा म्हणजे समस्त मानवजातीची सेवा, म्हणूनच तर मला अन्नदाता, उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते. पण, याचा काय फायदा? आमची दुखरी बाजूही तुम्हांला कळायला हवी. देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो. 

कधी कोरडा दुष्काळ तर कधी भयंकर वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जातो. आमची सगळी भिस्त पावसावर. पावसाचा लहरीपणा आमच्या साऱ्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी करतो. पाऊस जास्त झाला, कमी झाला किंवा अवेळी झाला तरी प्रत्येकवेळी नुकसान आमचेच. तोंडाशी आलेला घास कधी कधी पावसामुळे हिसकावला जातो. घरात धनधान्य आले, की आपण काय काय करायचे ही स्वप्न आमची पोरंबाळं या बांधांवर बसून पाहतात. फार मोठी नसतात ओ ती स्वप्नं. पण उभं पीक जेव्हा समोर नष्ट होताना दिसतं, तेव्हा ही स्वप्नं अश्रूंमध्ये वाहताना दिसतात. ती स्वप्नं तरी आम्हांला पूर्ण करता यावीत एवढीच काय ती आमची अपेक्षा!

शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरली पाहिजे अशी सगळयांची ओरड आहे. होय, बरोबरच आहे. मलाही ते मान्य आहे; पण आम्हांला योग्य ते साहित्य, मार्गदर्शन नको का मिळायला? नवे तंत्र, नवे शोध तेव्हाच लागतील जेव्हा शेतीविषयक अभ्यासक्रम शाळांमधून शिकवले जातील. डॉक्टर, इंजिनिअरप्रमाणे विद्यार्थी 'मी आधुनिक शेतकरी बनणार' असे स्वप्न पाहतील.

नव्या संशोधनातून, वेगवेगळया साहित्यांच्या आधारे वातावरणातील बदल, ऋतूंमधील बदल, मातीचे परीक्षण, तिचे बदलते स्वरूप या साऱ्यांचा अभ्यास केला जाईल. यांवरच आमची आशा मातीशी नाते राखणारा आणि आपल्या मेहनतीने आभाळालाही गवसणी घालणारा शेतकरी लवकरच तुमच्या पिढीत अवतरेल अशी आशा आहे.

हमी भाव मिळत नसल्याने पिकलेला माल कवडीमोल किमतीला विकावा लागतो. कधी कधी असाच फेकूनही द्यावा लागतो. शेती करणे हे अजिबात सोपे काम नाही. अडते, दलाल आपल्या फायद्यासाठी आमचा उपयोग करून घेतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात आमच्या मागण्यांसाठी आम्हाला बंद, संप करावे लागतात. यासारखे दुर्दैव ते काय.

आर्थिक संकटात सापडलेल्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांसारखी वाईट अवस्था इतर कोणाचीही नसेल. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने योग्य त्या योजना राबवून पाठबळ दिले, तर आम्ही शेतकरी म्हणून ताठ मानेने जगू शकू.

एक गोष्ट मात्र नक्की, शेतकरी आहे म्हणून शेत आहे आणि शेत आहे म्हणून अन्न आहे आणि अन्न आहे म्हणून आपण जिवंत आहे, हे सर्व जग जिवंत आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - निबंधलेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 20.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन | Q इ. ५.
SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 16.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन २ | Q इ. ५.

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


नमुना कृती.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


आदर्श विद्यालय, कोल्हापूर
‘मराठी भाषा दिन’ सोहळा

दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता

  • काव्यवाचन
  • कथाकथन
  • नाट्यप्रयोग
  • गीतगायन

विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी.

वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

गप्पा मारण्याचे व्यसन


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


अश्वमेध सभागृह

– दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या –

– कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन –

दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8

प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे

35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या

वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी.

वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×