English

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा: मी शाळेची घंटा बोलतेय - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय

Writing Skills
Advertisements

Solution

मी शाळेची घंटा बोलतेय

रोज सकाळी ठणठणाट करून मुलांना पळापळ करायला लावणारी अशी मी कोण आहे बरे? चकचकीत पितळी शरीराची, भलीमोठी, शाळेच्या आवारात टांगलेली अशी मी कोण आहे बरे? अहो, मी आहे शाळेतली घंटा.

रोज सकाळी साडेसात वाजता मी नित्य नेमाने वाजते. तेव्हा सगळी मुले धावतपळत वर्गात येऊन बसलेली असतात. त्यानंतर प्रार्थना होते. मी ठणठणाट केल्यावरही जी मुले उशीरा येतात त्यांना शिक्षा भोगावी लागते. कारण वेळ पाळण्याचे महत्व किती आहे ही शिस्त मुलांच्या अंगी लहानपणीच बाणवणे हेच तर शाळेचे कर्तव्य असतेना.

शाळा सुरू झाली की माझे काम संपले असे होत नाही बरे का! त्यानंतर प्रत्येक तासातासाला घंटा होते. तेव्हा एक शिक्षक आपला तास संपवून जातात आणि दुसरा विषय शिकवायला पुढले शिक्षक येतात. अशा रीतीने वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषय रोज झाले पाहिजेत ह्यासाठी माझे योगदान किती आहे हे तुम्हाला आता कळले असेलच.

त्याशिवाय छोटी सुट्टी, मधली सुट्टी आणि शाळा संपते तेव्हाही मीच मोठ्याने ठणठणाट करते मात्र सुट्टी सुरू झाल्याचा ठणठणाट मी केला की सगळी मुले हो… असा मोठा आवाज करून उठतात.

कित्येक मुलांना पटापट डबा खाऊन शाळेच्या मैदानावर खेळायला जायचे असते. त्यांचे खेळणे बघायला मलाही आवडते पण काय करणार? सुट्टीची वेळ संपली की मला परत ठणठणाट करावा लागतोच ना? तेव्हा पाय ओढत मुले वर्गात परततात. पण गंमत म्हणजे तीच मुले शाळा सुटण्याचा ठणठणाट केला की पुन्हा धावायला आणि आरडाओरडा करायला तयार असतातच. तेव्हा मलाही बरे वाटते.

माझे आणि शाळेतल्या शिपाईदादांचे जवळचे नाते आहे. कारण शिपाईदादांनी जर माझे टोले वेळेवर दिलेच नाहीत तर मी तरी कशी काय वाजणार? आमच्या शाळेतले श्यामभाऊ शिपाई आहेत त्यांच्याकडे हे जबाबदारीचे काम सोपवले गेले आहे. ते गेली कित्येक वर्षे नियमितपणे हे काम करीत आहेत. किती मुले आली आणि गेली परंतु मी मात्र वर्षानुवर्षांपासून माझे काम करीत आले आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.


नमुना कृती:


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

हुंडा-एक सामाजिक समस्या


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×