Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
Advertisements
Solution
मी शाळेची घंटा बोलतेय
रोज सकाळी ठणठणाट करून मुलांना पळापळ करायला लावणारी अशी मी कोण आहे बरे? चकचकीत पितळी शरीराची, भलीमोठी, शाळेच्या आवारात टांगलेली अशी मी कोण आहे बरे? अहो, मी आहे शाळेतली घंटा.
रोज सकाळी साडेसात वाजता मी नित्य नेमाने वाजते. तेव्हा सगळी मुले धावतपळत वर्गात येऊन बसलेली असतात. त्यानंतर प्रार्थना होते. मी ठणठणाट केल्यावरही जी मुले उशीरा येतात त्यांना शिक्षा भोगावी लागते. कारण वेळ पाळण्याचे महत्व किती आहे ही शिस्त मुलांच्या अंगी लहानपणीच बाणवणे हेच तर शाळेचे कर्तव्य असतेना.
शाळा सुरू झाली की माझे काम संपले असे होत नाही बरे का! त्यानंतर प्रत्येक तासातासाला घंटा होते. तेव्हा एक शिक्षक आपला तास संपवून जातात आणि दुसरा विषय शिकवायला पुढले शिक्षक येतात. अशा रीतीने वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषय रोज झाले पाहिजेत ह्यासाठी माझे योगदान किती आहे हे तुम्हाला आता कळले असेलच.
त्याशिवाय छोटी सुट्टी, मधली सुट्टी आणि शाळा संपते तेव्हाही मीच मोठ्याने ठणठणाट करते मात्र सुट्टी सुरू झाल्याचा ठणठणाट मी केला की सगळी मुले हो… असा मोठा आवाज करून उठतात.
कित्येक मुलांना पटापट डबा खाऊन शाळेच्या मैदानावर खेळायला जायचे असते. त्यांचे खेळणे बघायला मलाही आवडते पण काय करणार? सुट्टीची वेळ संपली की मला परत ठणठणाट करावा लागतोच ना? तेव्हा पाय ओढत मुले वर्गात परततात. पण गंमत म्हणजे तीच मुले शाळा सुटण्याचा ठणठणाट केला की पुन्हा धावायला आणि आरडाओरडा करायला तयार असतातच. तेव्हा मलाही बरे वाटते.
माझे आणि शाळेतल्या शिपाईदादांचे जवळचे नाते आहे. कारण शिपाईदादांनी जर माझे टोले वेळेवर दिलेच नाहीत तर मी तरी कशी काय वाजणार? आमच्या शाळेतले श्यामभाऊ शिपाई आहेत त्यांच्याकडे हे जबाबदारीचे काम सोपवले गेले आहे. ते गेली कित्येक वर्षे नियमितपणे हे काम करीत आहेत. किती मुले आली आणि गेली परंतु मी मात्र वर्षानुवर्षांपासून माझे काम करीत आले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
नमुना कृती:

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
| सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
| दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
| प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
|
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.

