Advertisements
Advertisements
Question
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
Advertisements
Solution
निसर्ग माझा गुरु
निसर्ग म्हणजे सृष्टी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंच तत्त्वांनी बनलेली सृष्टी. निसर्गाचे व मनुष्याच नात अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते. निसर्ग हा आपला अनेक गुरुपैकी एक आहे. गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाश देऊन जातात, जो आपल्याला घडवतो, ज्ञान देतो त्याला आपण आपला गुरू मानतो.
निसर्ग सुद्धा त्यांच्यापैकी एक आहे. कारण निसर्ग सुद्धा आपल्याला शिकवतो, घडवतो आणि विविध प्रकारचे ज्ञान देतो. निसर्ग आपल्याला स्वतःच्या कृतीतून बरेच काही शिकवतो. त्यासाठी आपण त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे.
जेव्हा मी निसर्गाशी एकरूप झालो. तेव्हापासून मला निसर्गाची अनेक रूपे, घटक, आकार अनुभवायला मिळाले. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्या कृतीतून काही ना काही शिकवण देतच असतो. आपल्याला ते आकलन करण्याची कला असली पाहिजे.
काही उदाहरणे पहिली तर तुम्हाला त्यातील सत्यता समजेल. खळखळ वाहणारे नदीचे प्रवाह, असंख्य संकटाला सामोरे जाऊन अखेर सागरा पर्यंत पोहचतात. यावरून नदी सांगते सतत कार्यरत राहा, संकटाना सामोरे जा, पण यशस्वी व्हा. झाडे कधी बोलत नाहीत पण खूप काही सांगतात. सतत दान करत राहा, छोटा-मोठा असा भेदभाव करू नका. मनाने सतत तरुण राहा. अशा प्रकारे पाने, फुले, पशु-पक्षी, किडे-मुंग्या, डोंगर-दऱ्या, नद्या-नाले, यांचे तुम्ही निरीक्षण करा त्यातून तुम्हाला काहीना काही नक्की शिकायला मिळेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

