Advertisements
Advertisements
Question
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

Advertisements
Solution
अकस्मात पडलेला पाऊस
मे महिन्याचा कडक उन्हाळा चालू होता. अतिशय कडक ऊन पडले होते. सकाळी सहा वाजतासुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवस वर येऊ लागला, तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून, हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जिवाची काहिली होत होती. बसून पाहिले. उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती. तेवढ्यात, भर दुपार असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार-गार वारा सुटला.
जमिनीवरील कागदकपटे, पालापाचोळा हवेत घुसळू लागले आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले. एखादया अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस इंदडत होता. आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो, मनसोक्त नाचू लागलो. खरे सांगू का? पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता. एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो. दारे-खिडक्या लावून घेतो. रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो. छत्र्या उघडतो. पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा, हॉटेलांचा आसरा घेतो.
आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो. आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्यात शिरला होता, हे सांगणे कठीण होते. सर्व भोवताल पाऊसमय झाला होता. झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती. मी मित्रमंडळींकडे पाहिले. सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते. कानांवरून, नाकाच्या शेंड्यांवरून, हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते. ते दृश्य मनाला आनंद देत होते. पावसाच्या त्या शीतल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती? आणि आता पाहा. पावसाने केवढा कायापालट केला होता! ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर, मनाच्या आत आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणात आहे?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
नमुना कृती:

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
