Advertisements
Advertisements
प्रश्न
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

Advertisements
उत्तर
अकस्मात पडलेला पाऊस
मे महिन्याचा कडक उन्हाळा चालू होता. अतिशय कडक ऊन पडले होते. सकाळी सहा वाजतासुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवस वर येऊ लागला, तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून, हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जिवाची काहिली होत होती. बसून पाहिले. उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती. तेवढ्यात, भर दुपार असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार-गार वारा सुटला.
जमिनीवरील कागदकपटे, पालापाचोळा हवेत घुसळू लागले आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले. एखादया अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस इंदडत होता. आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो, मनसोक्त नाचू लागलो. खरे सांगू का? पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता. एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो. दारे-खिडक्या लावून घेतो. रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो. छत्र्या उघडतो. पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा, हॉटेलांचा आसरा घेतो.
आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो. आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्यात शिरला होता, हे सांगणे कठीण होते. सर्व भोवताल पाऊसमय झाला होता. झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती. मी मित्रमंडळींकडे पाहिले. सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते. कानांवरून, नाकाच्या शेंड्यांवरून, हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते. ते दृश्य मनाला आनंद देत होते. पावसाच्या त्या शीतल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती? आणि आता पाहा. पावसाने केवढा कायापालट केला होता! ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर, मनाच्या आत आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणात आहे?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
