Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Advertisements
उत्तर
मी वृक्ष बोलत आहे
‘नमस्कार’ मी वृक्ष बोलतोय. माझा जन्म इथे या बागेत बऱ्याच वर्षांपूर्वी झाला होता. बागेत काम करुणाऱ्या माळी काकांनी इथे माझी बी पेरली. आधी मी आकाराने खूप छोटा होतो आता मोठा झालो. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे, माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की मी लोकांना खूप लाभ पोहोचवतो. जसे फळ, भाज्या, फूले, ऑक्सिजन इ. तसेच, जमिनीची धूप होऊ देत नाही. पाण्याची पातळी खोलवर पोहचवण्यास मदत करतो. झाडांवर खूप काही अवलंबून आहे. जसे पाऊस, वातावरणाचा समतोल राखणे. आम्हीच आहोत जे वरूण राजाला आमंत्रण देतो. त्यामुळे जलचक्र सुरळीत चालते. चांगला पाऊस म्हणजे उत्तम शेती म्हणजेच उत्तम उत्पादन.
गवत, झाड झुडुपं यामुळे निसर्गाची विविधता जपली जाते. सर्व वृक्ष ही जणू कल्पतरूच आहेत. कारण त्या सर्वांचा सर्वोतोपरी वापर हा फक्त मानवासाठीच आहे. तरी देखील तुम्ही आम्हाला दगड मारता, कुऱ्हाडी चालवता काय मिळते हे करून?
शहरीकरणाच्या नादात तुम्ही आम्हाला पृथ्वीवरून नाहिसे तर नाही करणार ना? निसर्गसंपत्ती म्हणजे आम्हीच आहोत. दुसरे तिसरे काही नाही, असे झाले तर काय हाहाकार माजेल या पृथ्वीतलावर याचा कधी विचार केला का तुम्ही? मान्य आहे राहण्यासाठी चांगले घर आवश्यक आहे. त्याचबरोबर आमची राखणपण खूप आवश्यक आहे.
मी प्रत्येकाला विनंती करतो, मला जपून ठेवा, अधिक झाडं लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. पृथ्वीला सुखी आणि समृद्ध ठेवण्यासाठी माझं अस्तित्व अत्यावश्यक आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

