मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

पुस्तकाचे आत्मवृत्त

एकदा सकाळी उठण्यास फारच वेळ झाला. मन आळसावले होते. अभ्यासाच्या खोलीत जाऊन नुसताच टेबला जवळील खुर्चीवर बसलो होतो. टेबलावर पुस्तके अस्ताविस्तपणे पडली होती. मी मनामध्ये काही विचार करीत होतो. तेव्हाच कानांवर काही शब्द पडले अरे नुसताच काय बसतोस या पुस्तकांकडे बघता हल्ली बरीच पुस्तके तु हातात घेतोस आणि ठेवून देतोस. मलाही तसेच करतोस. आमचा तुला कंटाळा आला आहे काय? या शब्दांनी मी भानावंर आलो. पाहतो तर इतिहासचे पुस्तक माझ्याशी चक्क बोलत होते. ते सांगत होते कि माझा जन्म एका नामवंत इतिहास संशोधकांच्या घरी झाला. त्यामुळे माझी किंमत वाढलेली होती. त्यामुळे मला खूप मागणी होती. मी अनेकांच्या घरी होते. माझी ज्ञानी माणसांबरोबर मैत्री झाली. मी सर्वांना खूप आवडत होते. माझा या सर्व लोकांना खुप उपयोग होत होता. त्याच्या ज्ञानामध्ये खूप मोठी भर पडत होती. माझ्यामध्ये खूप संशोधनाची माहिती असलेले सर्वजण माझा वारंवार उपयोग करून घेत होते. इतर पुस्तकापेक्षा मला जरा जास्त मान मिळत होता.

आता पुस्तकांचे स्वरूप बदलत चालले आहे. नवीन डिजीटल तंत्रज्ञानामुळे संगणकावरच बरीच पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे पुस्तकांचा वापर कमी होत चालला आहे. हा वापर कमी झाल्यामुळे बरे वाटते कारण आम्हांला वाचण्यासाठी सारखे हातात घेवून घेवून आम्हाला फाडून टाकले जाते. आमच्याकडे कोणी फारसे लक्षपण देत नाही. त्यामुळे आम्हांला आता थोडा आराम मिळतो. याचा आनंद आहे अरे पण हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. कारण जर सर्व पुस्तके संगणकावर उपलब्ध झाली तर पुस्तकाला मागणी कमी होणार त्यांची छपाईकमी होणार. बाजारात पुस्तके मिळणार नाहीत. मग गरिबांनी काय करायचे? त्यांना संगणक घेणे परवडणार नाही आणि ते चांगल्या ज्ञानापासून वंचित राहतील यांची खंत वाटते. दारावरील टकटकीने मी भानावर आलो. दारात आई चहाचा कप घेऊन उभी होती. मी चहा घेऊन पुस्तकाचा विचार करत असता पुस्तकाचे म्हणणे बरोबर आहे. याचा आपण विचार केला पाहिजे असे वाटले.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2018-2019 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :

'निसर्ग माझा सखा' 


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×