मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’

काय उपयोग तुमच्या पैश्याचा?
काय उपयोग तुमच्या धनाचा?
जर नसेल थेंबही पाण्याचा,
म्हणून जपा थेंब-थेंब पाण्याचा.

पाणी म्हणजे जल, नीर, तोय, उदक, अंबू, सलिल, जीवन. कितीतरी शब्द! पण पाण्याला जीवन असे हे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर वाटते. खरेच पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच शक्‍य नाही.

जगातील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज लागते. छोट्या-छोट्या जीव, जंतू पासून ते विशालकाय प्राण्यांना सुद्धा पाण्याची गरज असतेच. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अस्तित्व पाण्यामुळेच आहे.

पिण्याच्या आणि घरगुती वापराशिवाय पाणी जगाच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक आहे. पाण्याशिवाय आपली पृथ्वी टिकणार नाही. दैनंदिन जीवनात पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर अनेक कामासाठी वापरले जाते. स्वच्छतेच्या कामासाठी ही पाण्याचा खूप वापर केला जातो.

शेती संपूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. जर पाणी नसेल तर आपल्याला शेतीही करता येणार नाही. शेती नाही तर अन्नधान्य नाही. अन्नधान्य नाही तर माणसाचे जगणे अशक्यच. पाणीचे नसेल तर हा सुंदर हिरवागार निसर्ग कोमेजून जाईल. कुठेही चैतन्य दिसणार नाही म्हणून पाणी हे मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.

पाणी हे अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आपण पाहतो हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते तसेच खूप पाऊस पडतो पण पाणी जिरवले न गेल्यामळे पाणी समुद्राला जाऊन मिळते त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. त्यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे.

पाण्याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत शुद्ध ठेवणे ही काळाची गरज आहे. तरच मानवी जीवन सुखी समृद्ध होईल.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्‍न

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

मी रेडिओ बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×