Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

Advertisements
उत्तर
माझी जंगल सफर
सहामाही परीक्षा संपली आणि घरी आल्याबरोबर आईने आनंदाची बातमी दिली की आपल्याला मामाच्या गावी जायचे आहे. मामाच्या गावी गेलो असताना जंगलची सफर करण्याचा अनुभव आला. माझ्यासारख्या शहरात वाढलेल्या मुलासाठी हा अनुभव विलक्षण होता. पहाटेपहाटेच मी, माझे भाऊ आणि दोघे मामा असा हौशी गोतावळा गावाबाहेरील शिवारातून जंगलाच्या झाडीत शिरला. मामाने हातात काठी घेतली होती. झाडांमधून वाट काढत आमची सफर सुरू झाली. मानवी वस्तीपासून दूर एका वेगळया दुनियेची मला ओळख होत होती.
आम्ही शहरात वाढलेली भावंडं मात्र पायाखाली येणाऱ्या काटक्यांच्या आवाजानेही दचकत होतो. पण माझे मामा जंगलाशी चांगलेच परिचित असल्याने बिनधास्त वाट तुडवत होते. पक्ष्यांच्या वेगवेगळया शिट्ट्या ऐकताना गंमत येत होती; मात्र एक अनामिक भीती सतत जाणवत होती. जंगलातील आतल्या बाजूला झाडांच्या दाटीमुळे फारसा सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता. आकाश गायब झाल्यासारखे वाटत होते.
कित्येक वर्षे जुने असलेले उंच वृक्ष. कधीही पाहिले नाही तेच जंगलाच्या जुनेपणाचा अंदाज देत होते. करवंदाच्या जाळया, त्यामध्ये पिकलेली करवंदे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. हात घालू पाहताच काट्यांनी आम्हांला बोचकारले. मामाने मात्र सराईतपणे एकही काटा न बोचता अलगद करवंदं काढून दिली. एवढा मधुर रानमेवा आम्ही कधी चाखलाच नव्हता. अचानक पुढ्यातून कोणीतरी टुणकन उडी मारली. मी आणि माझे भाऊ दचकलोच. पाहतो तर काय? आमच्या पुढ्यातून एक ससा उड्या मारत गवतामध्ये दिसेनासा झाला. पुढे मोठमोठी वारुळे पाहून मी मनातून चरकलो. मामाने ही वारुळे मुंग्यांची असल्याचे सांगितल्याने हायसे वाटले. ज्या वारुळांवर सापाच्या सरपटण्याच्या खुणा असतात त्याच्या आसपास जायचे नाही एवढे मात्र मामाने आवर्जून सांगितले. ही माहिती नव्यानेच आमच्यामध्ये रूजत होती. जंगलातील अनेकविध पक्षी, त्यांचे आवाज, रंग, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी असा माहितीचा अमूल्य खजिनाच मामांनी आमच्यासमोर उघडला. त्यातून किती खजिना लुटू असा प्रश्न मनाला पडला होता.
जंगलातील तळयाच्या आजूबाजूला पाणी पिण्यासाठी अनेक प्राणी, पक्षी येत असल्याने त्यांना चाहूल लागू न देताच त्यांना पाहता येणे शक्य होते. काही अंतर चालत गेल्यावर मामाने आम्हांला सावध केले. आम्ही हळुवार पावलं टाकत झाडीतून तळयाचे निरीक्षण करू लागलो. हरणं, काळवीट, माकडं असे कित्येक प्राणी सावधगिरीने पाणी पित होते. पक्षीही पाणी पिऊन गाणी गात भुरऽकन उडत होते. हा सृष्टीचा सोहळा फार आनंददायी होता. अगदी डोळयांचे पारणे फिटवणारा! मनामध्ये नवे चैतन्य भरणारा!
खरे जीवन या निसर्गाच्या सान्निध्यात दडलेले आहे. माणसांप्रमाणेच या सृष्टीवर इतर प्राण्यांचाही अधिकार आहे. या साऱ्या जंगलप्रवासात माझ्या लक्षात आले, की आपली निसर्गसंपदा समृद्ध आहे. तो आपण मान्य केला, तर जगण्याची मजा आणखी वाढेल. निसर्गाच्या सहवासातील अप्रतिम आनंद काय असतो याचा अनुभव मी या जंगलसफारीत घेतला. जंगलात शिरताना घाबरलेला मी मात्र अलिबाबाची गुहा पाहून आल्याप्रमाणे मोठ्या आनंदात घरी परतलो. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या प्रवासात मी अनेक पक्ष्याचे मनसोक्त फोटो काढले.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.

खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
| सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
| दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
| प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
|
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

