Advertisements
Advertisements
प्रश्न
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

Advertisements
उत्तर
मी पक्षी झाले, तर...
जर कधी देवाने माझ्यासमोर उभे राहून, “तुम्हाला काय हवं ते मागा” असं म्हटलं, तर मी त्याला तत्काळ सांगेन, “मला पक्षी बनवा!” पक्षी बनल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय असेल! सकाळच्या धकाधकीतून मुक्ती मिळेल. मी उडूनच शाळेत जाईन, वाहतुकीची कोंडी, खड्डे, आणि सायकल चालवण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल. बस किंवा रेल्वेच्या तिकिटांची चिंता नसेल. आमच्या शेजारचा दादा शिक्षणासाठी परदेशी चालला होता, त्यावेळी पासपोर्ट व व्हिसा यांनी त्याचा जीव खाल्ला होतो. हे असले त्रास तर नावालाही नसतील.
प्रवास करायचा झाला तर, ‘इथे जाऊ का? तिथे जाऊ का?’ अशी विचारणा नसेल. पंख पसरावेत आणि उडाण घ्यावं. जिथे हवं तिथे जावं. कधी फांदीवर, कधी झाडाच्या टोकावर बसावं. निसर्गाचं सौंदर्य आत्मसात करावं. उंचावर जाऊन आकाशाचा अनुभव घ्यावा, ढगांवर बसून विश्रांती घ्यावी.
पण, एक गोष्ट मनात अस्वस्थ करते. पक्षी बनल्यावर, शाळा कुठे असेल? माझे मित्र कुठे असतील? खेळायला कसं जाणार? भाषेचा प्रश्न आहे. मी एकटीच आकाशात उडत राहणार? मग ते एकांत असह्य होईल. पक्षी बनण्याचा विचार रोमांचक आहे, पण त्यात दु:खही आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
