Advertisements
Advertisements
Question
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

Advertisements
Solution
मी पक्षी झाले, तर...
जर कधी देवाने माझ्यासमोर उभे राहून, “तुम्हाला काय हवं ते मागा” असं म्हटलं, तर मी त्याला तत्काळ सांगेन, “मला पक्षी बनवा!” पक्षी बनल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय असेल! सकाळच्या धकाधकीतून मुक्ती मिळेल. मी उडूनच शाळेत जाईन, वाहतुकीची कोंडी, खड्डे, आणि सायकल चालवण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल. बस किंवा रेल्वेच्या तिकिटांची चिंता नसेल. आमच्या शेजारचा दादा शिक्षणासाठी परदेशी चालला होता, त्यावेळी पासपोर्ट व व्हिसा यांनी त्याचा जीव खाल्ला होतो. हे असले त्रास तर नावालाही नसतील.
प्रवास करायचा झाला तर, ‘इथे जाऊ का? तिथे जाऊ का?’ अशी विचारणा नसेल. पंख पसरावेत आणि उडाण घ्यावं. जिथे हवं तिथे जावं. कधी फांदीवर, कधी झाडाच्या टोकावर बसावं. निसर्गाचं सौंदर्य आत्मसात करावं. उंचावर जाऊन आकाशाचा अनुभव घ्यावा, ढगांवर बसून विश्रांती घ्यावी.
पण, एक गोष्ट मनात अस्वस्थ करते. पक्षी बनल्यावर, शाळा कुठे असेल? माझे मित्र कुठे असतील? खेळायला कसं जाणार? भाषेचा प्रश्न आहे. मी एकटीच आकाशात उडत राहणार? मग ते एकांत असह्य होईल. पक्षी बनण्याचा विचार रोमांचक आहे, पण त्यात दु:खही आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.

खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.
