English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’

काय उपयोग तुमच्या पैश्याचा?
काय उपयोग तुमच्या धनाचा?
जर नसेल थेंबही पाण्याचा,
म्हणून जपा थेंब-थेंब पाण्याचा.

पाणी म्हणजे जल, नीर, तोय, उदक, अंबू, सलिल, जीवन. कितीतरी शब्द! पण पाण्याला जीवन असे हे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर वाटते. खरेच पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच शक्‍य नाही.

जगातील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज लागते. छोट्या-छोट्या जीव, जंतू पासून ते विशालकाय प्राण्यांना सुद्धा पाण्याची गरज असतेच. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अस्तित्व पाण्यामुळेच आहे.

पिण्याच्या आणि घरगुती वापराशिवाय पाणी जगाच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक आहे. पाण्याशिवाय आपली पृथ्वी टिकणार नाही. दैनंदिन जीवनात पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर अनेक कामासाठी वापरले जाते. स्वच्छतेच्या कामासाठी ही पाण्याचा खूप वापर केला जातो.

शेती संपूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. जर पाणी नसेल तर आपल्याला शेतीही करता येणार नाही. शेती नाही तर अन्नधान्य नाही. अन्नधान्य नाही तर माणसाचे जगणे अशक्यच. पाणीचे नसेल तर हा सुंदर हिरवागार निसर्ग कोमेजून जाईल. कुठेही चैतन्य दिसणार नाही म्हणून पाणी हे मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.

पाणी हे अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आपण पाहतो हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते तसेच खूप पाऊस पडतो पण पाणी जिरवले न गेल्यामळे पाणी समुद्राला जाऊन मिळते त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. त्यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे.

पाण्याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत शुद्ध ठेवणे ही काळाची गरज आहे. तरच मानवी जीवन सुखी समृद्ध होईल.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


नमुना कृती:


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


आदर्श विद्यालय, कोल्हापूर
‘मराठी भाषा दिन’ सोहळा

दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता

  • काव्यवाचन
  • कथाकथन
  • नाट्यप्रयोग
  • गीतगायन

विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी.

वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


साधना विद्यालय, धुळे
इयत्ता दहावी - शुभेच्छा समारंभ 
दि. ४ फेब्रुवारी, स. १० वाजता 
अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ
प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे

वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×