हिंदी

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’

काय उपयोग तुमच्या पैश्याचा?
काय उपयोग तुमच्या धनाचा?
जर नसेल थेंबही पाण्याचा,
म्हणून जपा थेंब-थेंब पाण्याचा.

पाणी म्हणजे जल, नीर, तोय, उदक, अंबू, सलिल, जीवन. कितीतरी शब्द! पण पाण्याला जीवन असे हे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर वाटते. खरेच पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच शक्‍य नाही.

जगातील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज लागते. छोट्या-छोट्या जीव, जंतू पासून ते विशालकाय प्राण्यांना सुद्धा पाण्याची गरज असतेच. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अस्तित्व पाण्यामुळेच आहे.

पिण्याच्या आणि घरगुती वापराशिवाय पाणी जगाच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक आहे. पाण्याशिवाय आपली पृथ्वी टिकणार नाही. दैनंदिन जीवनात पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर अनेक कामासाठी वापरले जाते. स्वच्छतेच्या कामासाठी ही पाण्याचा खूप वापर केला जातो.

शेती संपूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. जर पाणी नसेल तर आपल्याला शेतीही करता येणार नाही. शेती नाही तर अन्नधान्य नाही. अन्नधान्य नाही तर माणसाचे जगणे अशक्यच. पाणीचे नसेल तर हा सुंदर हिरवागार निसर्ग कोमेजून जाईल. कुठेही चैतन्य दिसणार नाही म्हणून पाणी हे मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.

पाणी हे अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आपण पाहतो हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते तसेच खूप पाऊस पडतो पण पाणी जिरवले न गेल्यामळे पाणी समुद्राला जाऊन मिळते त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. त्यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे.

पाण्याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत शुद्ध ठेवणे ही काळाची गरज आहे. तरच मानवी जीवन सुखी समृद्ध होईल.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फॅशनचे वेड


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×