Advertisements
Advertisements
प्रश्न
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
Advertisements
उत्तर
निसर्ग माझा गुरु
निसर्ग म्हणजे सृष्टी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंच तत्त्वांनी बनलेली सृष्टी. निसर्गाचे व मनुष्याच नात अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते. निसर्ग हा आपला अनेक गुरुपैकी एक आहे. गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाश देऊन जातात, जो आपल्याला घडवतो, ज्ञान देतो त्याला आपण आपला गुरू मानतो.
निसर्ग सुद्धा त्यांच्यापैकी एक आहे. कारण निसर्ग सुद्धा आपल्याला शिकवतो, घडवतो आणि विविध प्रकारचे ज्ञान देतो. निसर्ग आपल्याला स्वतःच्या कृतीतून बरेच काही शिकवतो. त्यासाठी आपण त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे.
जेव्हा मी निसर्गाशी एकरूप झालो. तेव्हापासून मला निसर्गाची अनेक रूपे, घटक, आकार अनुभवायला मिळाले. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्या कृतीतून काही ना काही शिकवण देतच असतो. आपल्याला ते आकलन करण्याची कला असली पाहिजे.
काही उदाहरणे पहिली तर तुम्हाला त्यातील सत्यता समजेल. खळखळ वाहणारे नदीचे प्रवाह, असंख्य संकटाला सामोरे जाऊन अखेर सागरा पर्यंत पोहचतात. यावरून नदी सांगते सतत कार्यरत राहा, संकटाना सामोरे जा, पण यशस्वी व्हा. झाडे कधी बोलत नाहीत पण खूप काही सांगतात. सतत दान करत राहा, छोटा-मोठा असा भेदभाव करू नका. मनाने सतत तरुण राहा. अशा प्रकारे पाने, फुले, पशु-पक्षी, किडे-मुंग्या, डोंगर-दऱ्या, नद्या-नाले, यांचे तुम्ही निरीक्षण करा त्यातून तुम्हाला काहीना काही नक्की शिकायला मिळेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
नमुना कृती:

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


