मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. मी फळा बोलतोय - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मी फळा बोलतोय

मी जरी दिसण्यात काळा असलो तरी अनेक लोकांचे यशस्वी आणि उज्वल भवितव्य मी घडवले आहे. माझ्यावर लिहिण्यात आलेली गणिते, विज्ञान, इंग्रजी आणि सुंदर सुविचार यांनी अनेक आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक घडवले आहेत. मित्रांनो कदाचित आपण मला ओळखलेच असेल? नाही ओळखले तर ऐका, मी एक फळा बोलतो आहे.

माझ्या जन्म एक कोरा फळा म्हणून झाला होता. या कोऱ्या फळ्यावर कोणीही त्याचे विचार मांडू शकत होते. मी खरोखर एक महान शोध होतो. झाडे, दगड यांच्यावर लिहित बसण्यापेक्षा माझ्यावर लिहिणे सोपे आणि सरल होते. आधीच्या काळात जेव्हा भाषेचा विकास झाला नव्हता तेव्हा काही लोक माझ्यावर चित्र आणि आकृत्या काढून संवाद साधत असत. 

जसा वेळ बदलत गेला तशी संभाषणाची साधने देखील बदलली. नंतरच्या काळात कागदाचा शोध लागला. आणि लोक कागदावर आपले विचार काढू लागले. माझा उपयोग आधी पेक्षा कमी झाला. कारण कागद हे एका जागेवरून दुसऱ्या जागी सहज नेता येणारे साधन होते. म्हणून माझा उपयोग फक्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला जाऊ लागला. शाळेतील शिक्षकांसाठी मी अतिशय महत्त्वाचे साधन आहे. माझ्यावर खडूच्या मदतीने लिखाण केले जाते. खडू आणि मी खूप चांगले मित्र बनलो आहेत. मी खडू शिवाय अपूर्ण आहे आणि खडू माझ्याशिवाय. परंतु डस्टर आम्हा दोघांचे शत्रू आहे. ते खडूने माझ्यावर लिहिलेले सुंदर अक्षर पुसून टाकते. परंतु तरीही आमची मैत्री कमी झालेली नाही आहे. 

आज मनुष्याने लावलेले नवनवीन शोध जसे मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्ट डिस्प्लेमुळे माझा वापर आधीपेक्षा खूप कमी झाला आहे. आता बऱ्याच शाळांमधूनही मला बरखास्त करण्यात आले आहे. माझ्या ऐवजी टच स्क्रीन डिस्प्लेचा वापर केला जात आहे. ह्या डिस्प्लेवर लिहिण्यासाठी खडूची आवश्यकता राहत नाही. आपल्या बोटाने शिक्षक यावर अक्षरे गिरवू शकतात. याला पुसण्यासाठी डस्टरची आवश्यकता नसते. इरेज फंक्शन वापरून लिहिलेले एका क्षणात पुसता येते.

या टच स्क्रीन डिस्प्लेवर कोणतेही चित्र, आकृत्या, गणिते, व्हिडिओ दाखवता येतात. ही फंक्शने माझ्यात नव्हती म्हणून आज माझ्या जागी याचाच वापर केला जात आहे. परंतु जरी आजच्या आधुनिक युगात माझा वापर कमी झालेला असला तरीही माझे महत्त्व मात्र कमी झालेले नाही. ते पूर्वीसारखीच आहे. आणि आजही जे गरीब विद्यार्थी महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना माझ्याच साह्याने शिकवले जाते.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्‍न

खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


नमुना कृती.


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

मी रेडिओ बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

गप्पा मारण्याचे व्यसन


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


अश्वमेध सभागृह

– दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या –

– कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन –

दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8

प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे

35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या

वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी.

वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×