Advertisements
Advertisements
प्रश्न

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
Advertisements
उत्तर
अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ
दिनांक २२ डिसेंबर ... हो, याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम होता. आम्ही सर्व मित्रमंडळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आमच्या लाडक्या मित्राचे – आनंदचे अभिनंदन करण्याकरता अर्धा तास आधीच शाळेच्या पटांगणावर जमलो.
कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांचे व अध्यक्षांचे स्वागत मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. स्वागतगीत, ईशस्तवन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यानंतर आम्हांला प्रतीक्षा होती त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय, आंतरशालेय स्पर्धांतील पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांची नावे घेतली जाऊ लागली, तसतसे ते ते विद्यार्थी आपल्या आसनावरून उठून बक्षीस घेऊन येऊ लागले. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.
आणि अचानक एक क्षण पटांगणावर शांतता पसरली. मुख्याध्यापक व्यासपीठावरून उठले आणि त्यांनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या शाळेची कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आनंदविषयी कौतुकोद्गार काढत त्याला व्यासपीठावर बोलावले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. आम्ही मित्रही आमच्या आनंदला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या व शाळेच्या नावाने आरोळ्या ठोकत होतो. ज्या क्षणी सन्मानचिन्ह देऊन आनंदचा गौरव केला गेला तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला.
इतका सन्मान मिळूनही आनंदचे पाय मात्र जमिनीवरच होते. बक्षीस स्वीकारल्यानंतर आभार मानण्यासाठी माईक हातात धरून तो बोलू लागला. वास्तविक, अत्यंत कष्टमय परिस्थितीतून त्याने हे यश संपादन केले होते; पण त्या कष्टांचा अजिबात बाऊ न करता किंवा स्वत:च्याच मुखाने स्वत:च्या मेहनतीचे पाढे न वाचता आनंदने आपल्या आईचे, शिक्षकांचे, आम्हां मित्रांचे आभार मानले. आपल्या यशाचे सारे श्रेय त्याने अशाप्रकारे सर्वांत वाटून टाकले. तितक्याच नम्रतेने सर्व प्रमुख पाहुणे, व्यासपीठ व उपस्थितांना लवून नमस्कार करून तो जेव्हा खाली उतरला तेव्हा त्याच्या या गुणाचे कौतुक खुद्द प्रमुख पाहुण्यांनी केले. हा लाडका मित्र भविष्यातही अशीच प्रगती करत राहावा ही सदिच्छा मनाशी बाळगत आम्ही कार्यक्रम संपताच घरी परतलो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

