English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.

Advertisements
Advertisements

Question

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ

दिनांक २२ डिसेंबर ... हो, याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम होता. आम्ही सर्व मित्रमंडळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आमच्या लाडक्या मित्राचे – आनंदचे अभिनंदन करण्याकरता अर्धा तास आधीच शाळेच्या पटांगणावर जमलो.

कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांचे व अध्यक्षांचे स्वागत मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. स्वागतगीत, ईशस्तवन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यानंतर आम्हांला प्रतीक्षा होती त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय, आंतरशालेय स्पर्धांतील पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांची नावे घेतली जाऊ लागली, तसतसे ते ते विद्यार्थी आपल्या आसनावरून उठून बक्षीस घेऊन येऊ लागले. टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

आणि अचानक एक क्षण पटांगणावर शांतता पसरली. मुख्याध्यापक व्यासपीठावरून उठले आणि त्यांनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या शाळेची कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आनंदविषयी कौतुकोद्गार काढत त्याला व्यासपीठावर बोलावले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. आम्ही मित्रही आमच्या आनंदला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या व शाळेच्या नावाने आरोळ्या ठोकत होतो. ज्या क्षणी सन्मानचिन्ह देऊन आनंदचा गौरव केला गेला तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला.

इतका सन्मान मिळूनही आनंदचे पाय मात्र जमिनीवरच होते. बक्षीस स्वीकारल्यानंतर आभार मानण्यासाठी माईक हातात धरून तो बोलू लागला. वास्तविक, अत्यंत कष्टमय परिस्थितीतून त्याने हे यश संपादन केले होते; पण त्या कष्टांचा अजिबात बाऊ न करता किंवा स्वत:च्याच मुखाने स्वत:च्या मेहनतीचे पाढे न वाचता आनंदने आपल्या आईचे, शिक्षकांचे, आम्हां मित्रांचे आभार मानले. आपल्या यशाचे सारे श्रेय त्याने अशाप्रकारे सर्वांत वाटून टाकले. तितक्याच नम्रतेने सर्व प्रमुख पाहुणे, व्यासपीठ व उपस्थितांना लवून नमस्कार करून तो जेव्हा खाली उतरला तेव्हा त्याच्या या गुणाचे कौतुक खुद्द प्रमुख पाहुण्यांनी केले. हा लाडका मित्र भविष्यातही अशीच प्रगती करत राहावा ही सदिच्छा मनाशी बाळगत आम्ही कार्यक्रम संपताच घरी परतलो.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 16.3: उपयोजित लेखन - लेखन कौशल्य [Page 78]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 16.3 उपयोजित लेखन
लेखन कौशल्य | Q १ | Page 78

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×