English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा. काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.

Writing Skills
Advertisements

Solution

युग संगणकाचे

       एकविसावे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आणि संगणकाचे युग आहे, असे म्हटले जाते. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने अनेक शोध लावले आणि प्रगतिपथावर येऊन पोहोचला. त्यातील आपल्या सर्वांना परिचयाचा असलेला शोध म्हणजे संगणकाचा शोध. सन १८३७ साली चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला. कालानुरूप त्याच्यात अनेक सुधारणा होत गेल्या आणि आजच्या युगात जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे.

       संगणक या यंत्राने आपली अनेक कामे अतिशय सोपी केली आहेत. बँकेचे व्यवहार, शासकीय कामे, अभियांत्रिकी-वैद्यवकीय क्षेत्र, शाळा, महाविद्यालये अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत संगणक प्रणालीचा वापर आवश्यक झाला आहे. पैशांचे व्यवहार आणि हिशोबाची कामे संगणकामुळे सोपी झाली आहेत. इंटरनेटच्या शोधामुळे तर आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही विषयाची माहिती तत्काळ आपल्याला संगणकाच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे मानवाला ज्ञानाची दालने खुली झाली आहेत. ई-मेल, सोशल मीडिया यांसारख्या गोष्टींचा वापर करून एकमेकांबरोबर माहितीची देवाणघेवाण करणे आणि संपर्क साधणे दोन्ही सहज शक्य झाले आहे. संगणक ही आजच्या युगाची क्रांती आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. संगणकामुळे आपली कामे लवकर होतात. कोणतेही काम तत्काळ आणि अचूक करता येत असल्यामुळे मानवी जीवनामध्ये संगणक काळाची गरज बनला आहे. कोरोनाच्या काळात तर लॉकडाऊनमुळे शिक्षण, ऑफिसची कामे, मीटिंग्ज या सगळ्याच गोष्टींसाठी संगणक अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.

       पण संगणकाचे अनेक उपयोग असले, तरी त्याचे काही तोटेदेखील आहेत. संगणकावर सतत काम केल्यामुळे अनेक लोकांना पाठदुखी, डोळ्याचे विकार जडत आहेत. संगणकावर काम करता करता माणसे अनेक वेळा संगणकाच्या आहारी गेल्याचे दिसून येते आहे. लहान मुले तसेच तरुण मुले अनेक वेळा दिवसभर कम्प्यूटर गेम खेळण्यात मग्न होतात. लहान मुले तर मैदानी खेळ विसरू लागली आहेत. त्या सगळ्याचा त्यांच्या डोळ्यांवर, शरीरावर, आरोग्यावर परिणाम होत आहे. संगणकामुळे दूरदूरच्या माणसांशी बोलणे सोपे झाले असले, तरी त्यामध्येच अडकून पडल्यामुळे घरातली माणसे, मित्रमंडळी यांच्याशी संवाद तुटला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करणे, सोशल मीडियाचा वापर करून खोटी माहिती पसरवणे, लोकांना भडकवणे अशा गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. अनेक वेळा दहशतवादी कारवाया करण्यासाठी सुद्धा संगणकाचा वापर केला गेल्याचे आढळले आहे. सायबर गुन्हे, अफरातफरी घडून येताना दिसत आहेत.

       शेवटी संगणक हे उपकरण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याची क्षमता कितीही जास्त असली तरी त्याला स्वत:चा मेंदू नाही. त्यामुळे योग्य काय अयोग्य काय हे संगणक स्वत: ठरवू शकत नाही, ते संगणक वापरणाऱ्या माणसावर अवलंबून असते. म्हणूनच मानवाने आपली सदसद्विवेकबुद्धी आणि नैतिकता वापरून संगणकाचा वापर कुठल्या गोष्टीसाठी आणि किती प्रमाणात करायचा हे ठरवणे जास्त महत्त्वाचं आहे. जर संगणकाचा वापर समाजाच्या, देशाच्या हितासाठी आणि विधायक कामांसाठी केला गेला, तर संगणक हा मानवी जीवनासाठी नक्कीच वरदान ठरेल.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2019-2020 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


आदर्श विद्यालय, कोल्हापूर
‘मराठी भाषा दिन’ सोहळा

दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता

  • काव्यवाचन
  • कथाकथन
  • नाट्यप्रयोग
  • गीतगायन

विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी.

वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

गप्पा मारण्याचे व्यसन


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फाटक्या पुस्तकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फॅशनचे वेड


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

हुंडा-एक सामाजिक समस्या


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×