English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

Long Answer
Advertisements

Solution

चला खेड्याकडे

'माझं कोकणातील गाव, मनामध्ये त्याचा ठाव,
जन येथले प्रेमळ, आनंद असे येथे अंमळ'

कवितेच्या या ओळी खेड्यांचे खरे रूप दर्शवणाऱ्या आहेत. खेड्यातले जीवन म्हणजे शांत व निरामय जीवन. शहरातील धावपळ नाही, गर्दी किंवा गोंधळ नाही, अथवा घड्याळाच्या काट्याचे गणित नाही. खेड्यातील हवेतच जणू निवांतपणा गवसतो. वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने होणारा त्रास नाही. पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यावी. नदीचे खळखळणारे पाणी, गाई-म्हशींचे हंबरणे अशी निसर्गाच्या कुशीत नेणारी खेड्यातील दुनिया. खेड्यातले वातावरण शुद्ध. रासायनिक कारखाने किंवा भरमसाठ वाहने नसल्यामुळे आजही खेडोपाडी शुद्ध हवा अनुभवता येते. माणसाला श्वास घेण्यास, खरंतर 'मोकळा श्वास' घेण्यास खेड्यासारखे ठिकाण नाही. येथील हे प्रसन्न वातावरण मानवी आरोग्यासही पोषक ठरते.

शहरीकरणाच्या झपाट्यात विविध जाती धर्मांचे, विविध संस्कृती असलेले लोक एकमेकांच्या सान्निध्यात आले. तरीही कामात व्यस्त असलेल्या, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकांना इतरांकडे लक्ष देण्यास किंबहुना स्वत:च्या घरात लक्ष देण्यास वेळ नाही. केवळ पैसा आणि काम यांमध्ये गुंतलेले लोक प्रेमळ, आनंदी जीवन विसरून गेल्यासारखे वाटतात. खेड्यात मात्र लोक कमी असल्यामुळे, एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत असल्यामुळे प्रत्येकजण सुखदु:खाच्या प्रसंगी एकमेकांच्या घरी जात असतात. संपूर्ण खेडे हे एखादे कुटुंब असल्याप्रमाणे आपुलकी राखून असते.

अशा सुंदर खेड्यांतून रोजगाराकरता शहराकडे वळलेल्या तरुणांना परत खेड्यात आणायचे असेल, तर त्यांच्यासाठी खेड्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. बंद पडलेले लघुद्योग, कुटीरोद्योग सुरू झाले अथवा नव्याने उद्योग निर्माण केले गेले, खेड्यातील नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगांना पाठबळ दिले गेले, तर खेड्यातील तरुण त्याच्या हक्काच्या घरी आनंदाने राहतील. शहरावर येणारा लोकसंख्येचा ताण त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.

शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचे आहे या भावनेतून शिक्षण दिले जाते. ही पद्धती बदलून शेतकरी हा समाजाचा अत्यावश्यक घटक आहे ही भावना नव्या पिढीच्या मनात रूजवून शेतीचे आधुनिक शिक्षण दिले गेले, तर खेड्यापाड्यांतून शेती पुन्हा बहरेल. शेती शाश्वत आहे आणि ती ओसाड पडून चालणार नाही. ती फुलवण्यासाठी नव्या दमाच्या तरुणांनी खेड्याकडे वळायलाच पाहिजे.

शहरात आलेल्या, शहरातील धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या प्रत्येकाचे स्वप्न असते मी माझ्या आयुष्यातील शेवटचा काळ निवांतपणे माझ्या गावात घालवेन. नोकरी, व्यवसायाच्या संधी, मूलभूत सुविधा निर्माण झाल्या, तर स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वयंपूर्ण खेडी परत एकदा माणसांनी बहरलेली दिसतील आणि जीवनाचा आनंद लुटतील, निवांतपणा अनुभवतील. खेडोपाडी मुक्तपणे जगताना दिसतील. यासाठी आपल्याला गांधीजींच्या 'खेड्यांकडे चला' हा संदेश प्रत्यक्षात उतरवावा लागेल.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - निबंधलेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 20.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन | Q इ. १.
SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 16.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन १ | Q इ. १.

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फॅशनचे वेड


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×