मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

वाचन प्रेरणा दिन

१५ ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून शाळेत साजरा केला जातो. यावर्षी आमच्याकडे त्याचे आयोजन करण्याची जबाबदारी होती. शाळेची सजावट करण्याकरता आम्ही वेगवेगळया सुभाषितांनी फलक सजवले. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कवी रमेश देशपांडे आणि लेखक राहुल पुरोहित यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.

मी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजीचे मनोगत रंगून जाऊन वाचले. आमच्यातल्याच काही विद्यार्थ्यांनी कथा एवढ्या सुंदर सादर केल्या, की आपण ती गोष्ट खरोखर पाहतो आहोत असा भास झाला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातील स्वागत म्हणणाऱ्या विद्यार्थ्याने जणू 'रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटक आमच्यापुढे उभे केले.

छान छान कविता वाचून दाखवल्या आणि आम्हांला म्हणायलाही लावल्या. त्या वेळी सर्व विद्यार्थी काव्यगायनात रंगून गेले होते. साऱ्यांनीच त्यांच्या या काव्यगायनाचे कौतुक केले. 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारी एक छोटी नाटिका इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यातील विनोदी संवादाने साऱ्यांचीच हसून हसून पुरेवाट झाली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन केले.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचन संस्कृती रूजवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामागचा हेतू होता की विद्यार्थ्यांनी कोणतेही एक पुस्तक वाचलेच पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांनी वाचलेले पुस्तक, त्यांना वाचनातून मिळालेला अनुभव व त्याविषयी त्यांचे मत याविषयी थोडक्यात सांगायचे होते. अनेकजणांनी आपल्या वाचनाचा आनंद खूप सविस्तरपणे मांडला.

आम्ही दहावीच्या विदयार्थ्यांनी आमच्या वर्गात विविध प्रकारच्या बालसाहित्याचे ऑनलाईन प्रदर्शन संगणक कक्षात भरवले होते. प्रत्यक्षात पुस्तके न मांडता संगणकावर इंटरनेटच्या साहाय्याने वेगवेगळी पुस्तके, साहित्य व वेबसाईट यांचे मार्गदर्शन यात करण्यात आले होते. शब्दकोश, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा, त्याची पिडिएफ स्वरूपातील आवृत्त्यांची प्रात्यक्षिके या ऑनलाईन प्रदर्शनातून देण्यात आली.

'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमासाठी लाभलेल्या या दिनानिमित्ताने आम्ही सुप्रसिद्ध लेखक व कवी श्री. अनंत भावे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यांनी आम्हांला कोणकोणती पुस्तके वाचावीत, ती कशी वाचावीत याबद्दल मार्गदर्शन केले. लेखक राहुल पुरोहित यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचा साधेपणा, त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व यांबद्दल सांगतानाच आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगलो, तर जगण्याचा खरा आनंद घेऊ शकतो असा संदेश दिला. या साहित्यिकांचे अनुभव आम्हां साऱ्यांनाच प्रेरणा देणारे ठरले.

मुख्याध्यापक श्री. शिर्के सरांनी कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नेटक्या आयोजनाबद्दल कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून त्यांनी 'वाचन प्रेरणा दिन' हा केवळ एका दिवसासाठी नसून साऱ्यांनीच रोज काही ना काही वाचावे असे आवाहन केले. 

माझ्यासाठी प्रत्येक दिन हा वाचनदिन असतो. ‘दिसामाजी वाचावे काहीतरी’ या उक्तीप्रमाणे वाचनानंद मी रोजच घेत असतो. परंतु वाचन प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी हा दिन साजरा करायला मला आवडतो.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.3: उपयोजित लेखन - निबंधलेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 20.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन | Q इ. ३.

संबंधित प्रश्‍न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

व्यक्तिचित्रणात्मक निबंध

माझा आवडता कलावंत.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


नमुना कृती:


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

हुंडा-एक सामाजिक समस्या


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :

'निसर्ग माझा सखा' 


क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


साधना विद्यालय, धुळे
इयत्ता दहावी - शुभेच्छा समारंभ 
दि. ४ फेब्रुवारी, स. १० वाजता 
अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ
प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे

वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×