मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा. भाषेचे महत्त्व - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

भाषेचे महत्त्व

भाषे विषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. माणूस हा एक प्राणीच आहे; मात्र तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. त्याने आपली प्रगती साधली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला मिळालेली भाषेची देणगी. माणसाला भाषा बोलता येऊ लागली, त्या भाषेला विविध आकारांच्या साहाय्याने त्याने लिपीबद्ध केले आणि माणूस आपले विचार लिहून ठेवू लागला. माणसाला भाषा बोलता येते. त्यामुळे, त्याच्या विचारातील सुस्पष्टता इतरांना कळते. प्राण्यांची, पक्ष्यांची आवाजाची भाषा असते; मात्र माणसांच्या भाषांसारखी ती सुसंगत, सुस्पष्ट नसते.

सर्वसाधारण व्यवहारात 'भाषा' ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण कशाचा नेमका अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागते. माणसाचे जीवन समृद्ध होण्यात त्याला गवसलेल्या भाषेचे खूप मोठे योगदान आहे. आपल्याला काय वाटते, समोरचा काय बोलतो? त्याचे विचार समजून घेण्यासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आपल्या विचारांचे आदान-प्रदान करण्यात भाषेचा मोठा वाटा आहे. भाषेमुळे माणसाने खूप मोठी प्रगती केली. आदिमानव ते आताच्या युगातील हायटेक मनुष्य यांमधील काळ हा भाषेमुळे माणसाची होत गेलेली प्रगती दर्शवतो. वेगवेगळे विषय, शास्त्रे, शोध, वस्तूंची निर्मिती या साऱ्यांचे मूळ भाषेमध्ये आहे.

भाषा ही संज्ञा विविध अर्थांनी वापरली जात. लहान बाळ आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींकडून भाषा शिकते. त्याच्या आजूबाजूला बोलले जाणारे शब्द आत्मसात करून वस्तू, व्यक्तींची नावे ते बाळ लक्षात ठेवते. पुढे आजूबाजूची मंडळी आणि शाळा यांद्वारे शब्दसंपदा वाढत जाते. त्याबरोबरीने ज्ञानही वाढते. अनेक व्यक्ती विविध प्रदेशांना भेटी देऊन नव्या भाषा शिकून, प्रचंड वाचन करून आपली शब्दसंपदा वाढवतात. विविध कलाकृती, काव्ये, महाकाव्ये, संगीत, नाटक, चित्रपट, वर्तमानपत्रे या साऱ्यांना भाषेचा खूप मोठा आधार आहे. भाषेचे स्वरूप देखील माणसाच्या प्रगतीप्रमाणे बदलत जाते. भाषेत नव्या शब्दांची भर पडते. ज्याप्रमाणे नवे शोध लागतात त्याप्रमाणे शब्दभांडार वाढत जाते. विश्वकोश, ज्ञानकोशदेखील शब्दभांडार विकसित करण्यास उपयुक्त ठरतात.

माणसाच्या विचारशक्तीवर, वैचारिक देवाणघेवाणीवर मानवाला व्यवहार करताना भाषेचा उपयोग होतो. वस्तूंचे आदानप्रदान, उद्योग इत्यादींमध्ये सुसूत्रता येण्यासाठी भाषा दुवा म्हणून कार्य करते. व्यवहारात वापरली जाणारी भाषा ही त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलत जाते. भाषेतील हा बदल काळाची गरज असते. अशारीतीने, माणूस म्हणून इतरांहून भिन्न प्रकारे जगताना भाषा त्याचे जीवन सुकर करते. भाषेने वेळोवेळी आपले रूप बदलले आहे. ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठी आणि आजची मराठी यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. भाषा टिकून राहण्यासाठी तिने होणारे बदल स्वीकारले पाहिजेत. त्याचबरोबर ती व्यवहार्य असली पाहिजे. बोलण्यासाठी सोपी, रोजच्या वापरातील, शब्दसंपदा विपुल प्रमाणात असणारी भाषा माणसाच्या उन्नतीचे कारण बनते. ही व्यवहारात उपयुक्त ठरणारी भाषा सहजसोपी, सरळ, काळानुरूप असल्याने ती जनमाणसांत रूजते.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.3: उपयोजित लेखन - निबंधलेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 20.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन | Q इ. ४.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
पाठ 16.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन १ | Q इ. ४.

संबंधित प्रश्‍न

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

गप्पा मारण्याचे व्यसन


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :

'निसर्ग माझा सखा' 


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×