Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

Advertisements
उत्तर
जलसाक्षरता : काळाची गरज
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे. पृथ्वीवरील पाणी हेच जीवन आहे असे म्हटले तरी ते चूक ठरणार नाही. पृथ्वीवर पाणी नसते, तर जीवसृष्टी निर्माणच झाली नसती. पाण्यामुळेच पृथ्वीवर सजीव आजवर टिकून आहेत. 'जल है तो कल है!' असे घोषवाक्य आपण अनेकदा ऐकतो. पाणी संपले, तर कदाचित संपूर्ण पृथ्वीवरचे जीवन नष्ट होईल. पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यापैकी ०.९% पाणीच नद्या, सरोवरे, विहिरी, तलाव यांमध्ये उपलब्ध आहे. त्याचाच उपयोग आपल्याला करावा लागतो. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, गरजांमधील वाढ या गोष्टी पाणीटंचाईला कारणीभूत ठरतात. एक दिवस असा येईल, की पाण्याची किंमत खनिज तेलापेक्षा जास्त असेल, येणारा भविष्यकाळ आपल्याला तिसरे महायुद्ध पाण्यासाठी दाखवेल अशी तज्ज्ञांची मते आपल्याला उद्याचे विदारक रूप दाखवतात.
पाण्याचे मूळ आणि ऋषीचे कूळ विचारू नये म्हणतात. पाणीरूपी अमृताचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. भारतात जलप्रदूषणाची मोठी समस्या आहे. औद्योगिकीकरणामुळे नद्या-नाले प्रदूषित केल्या जातात. मोठे मोठे कारखाने पाण्याचा वाटेल तसा वापर करून त्याची नासाडी करतात. घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे गळके नळ किंवा वापरानंतर तसेच, चालू ठेवलेले नळ हे पाण्याच्या अपव्ययाला कारणीभूत ठरतात. पाणवठ्यांवरील अस्वच्छताही पिण्यायोग्य पाण्याचे प्रदूषण करते. सणांमध्ये मूळ परंपरा बाजूला ठेवून उगाच पाण्याचा अपव्यय केला जातो. नद्यांमधून चालणारी जलवाहतूकही पाण्याची नासाडी करण्यास कारणीभूत ठरते. या सर्व कारणांमुळे आज पिण्यायोग्य पाण्याचे साठे अत्यंत मर्यादित झाले आहेत. अनेक शहरे, गावे पाणीटंचाईची भीषण समस्या अनुभवत आहेत. पाण्यासाठी मैलोन् मैलांची पायपीटही करावी लागत आहे. शेतीला पाणी नसल्याने ती ओसाड ठरत आहे. धरणांमधील पाणीसाठा आता अपुरा पडू लागला आहे. मनुष्य आणि इतर प्राणीही या पाणीटंचाईला बळी पडत आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात २ वेळा 'वॉश' घेणारेही अनेकजण असतात. त्यासाठी ५० ते १५० शुद्ध पाणी वापरले जाते. या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करणे व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती वैश्विक जबाबदारी आहे. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीने पाणी वाचवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. जलशुद्धीकरणाच्या नव्या तंत्राचा वापर, दूषित पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर, नव्या बांधकामांमध्ये परवानगी देताना पावसाळी पाण्याच्या साठवणीसाठी टाकी बांधण्याची अट अशा प्रकारच्या गोष्टींतून जलसंवर्धन शक्य आहे. छोट्या छोट्या नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवले, तर ते जमिनीत झिरपून पाण्याची पातळी वाढू शकेल. नद्यांचे पात्र पुन्हा खणणे, नद्या एकमेकींना जोडणे यांमुळेही पाण्याच्या समस्या कमी होतील.
खरे तर पाणी वाचविण्याची मानसिक तयारी जरूरी आहे, प्रबोधन जरूरी आहे. सांडपाण्याचाही पुनःवापर करता आला पाहिजे. पाऊस पडावा म्हणून झाडे लावून त्यांची काळजी घेतली, उघडे उजाड डोंगर हिरवेगार केले, तर निश्चितच पुरेसा पाऊस होईल. त्यामुळे, जलसाठे भरलेले राहतील. जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. प्रत्येकाने जलसाक्षर होऊन पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. नाहीतर माणसाकडे माणसाच्या डोळयांतल्या पाण्याशिवाय काही उरणार नाही.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
नमुना कृती.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

