Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
उत्तर
पावसाळ्यातील एक दिवस
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले...
कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्तींनी मनात घर केलं होत. बाहेर अंधारून आले होते. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. सूं सूं करत वारा थैमान घालू लागला. वादळ येईल की काय अशी शंका मनात येत होती, तितक्यात दार जोरात बंद झाल्याचा आवाज आला. आमच्या घरासमोरून दिसणाऱ्या थोड्या अंतरावरच्या मैदानात धुळीचा लोट आकाशात उडाला, भोवऱ्यासारखा गोलाकार घुमत घुमत खाली आला आणि त्याने आपले अंग भसकन जमिनीवर लोटून दिले. सर्वत्र पालापाचोळा उडाला. अचानक आकाशात लख्खकन् वीज सळसळली आणि टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला.
मातीचा सुगंध आसमंतात दरवळला आणि त्या थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यासाठी माझे हात नकळत खिडकीबाहेर सरसावले. हातावर पडणारे मोती झेलत, उधळत किती वेळ घरात राहणार? मग बिनधास्तपणे प्रत्यक्ष पाऊस अंगावर घेण्यासाठी बाहेर मोकळ्या वातावरणात आलो.
छपरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी छान ताल धरला होता. मी त्या पावसात अगदी मनसोक्त भिजलो. आनंदाने गाणी गायिली. चिखलात उड्या मारल्या. माझ्यासोबत आजूबाजूची झाडेही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत होती. संपूर्ण वातावरण हिरवे गार झाले होते. ढगांनी आपली सर्व पोतडी भरभरून धरेवर लोटून दिली होती जणू! वातावरण चैतन्यमय झाले होते. थकलेल्या, कंटाळलेल्या मनाला या सरींच्या शिडकाव्याने उल्हसित केले होते. हे अविस्मरणीय क्षण मनात साठवत, पावसाचे मुक्त, बरसणारे रूप अनुभवत माझी पावले घराच्या दिशेने वळली. जणू 'श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा। उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा।' असा प्रत्यय मी आज अनुभवला होता!
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
