Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –
Advertisements
उत्तर
माणुसकीची शिकवण
त्यादिवशी वरद घरी आला तो उड्या मारतच. त्यांच्या जिल्ह्यामध्ये लवकरच आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होणार होती. क्रिडास्पर्धेमध्ये धावण्याची स्पर्धा होती. वरद हा एक उत्तम धावपटू असल्यामुळे शाळेतर्फे वरदने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असं मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं. वरदने दुसऱ्या दिवशीपासूनच स्पर्धेचा सराव सुरू केला.
वरदच्या घराजवळ राहणारा तनय हा देखील उत्तम धावपटू होता आणि तोही त्याच्या शाळेमधून आंतरशालेय क्रीडास्पर्धेमध्ये भाग घेणार होता. आपण तनयला नक्कीच हरवू आणि पहिला क्रमांक मिळवू असा वरदला आत्मविश्वास होता आणि त्यासाठी तो भरपूर मेहनतही करत होता. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली. वरद, तनय आणि आणखी दोन मुलांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा होती. वरद जीव तोडून धावत होता आणि अचानक तनयचा पाय मुरगळला. तनय पटकन खाली बसला. वरदच्या हे लक्षात आलं. मागचापुढचा विचार न करता त्याने स्पर्धा सोडून तनयकडे धाव घेतली. त्याला उठायला मदत केली आणि हळूहळू आधार देऊन धावपट्टीच्या बाजूला असलेल्या एका बाकावर बसवलं. तनयचे शिक्षक आणि क्रीडास्पर्धेचे आयोजक हे सगळं बघत होते. तनयचे शिक्षकही धावत मदतीला आले.
तनय आणि वरद दोघेही स्पर्धेतून बाद झाले आणि दुसरा एक मुलगा स्पर्धा जिंकाला. आपण जिंकू शकलो नाही या विचारांनी वरदच्या डोळयामध्ये पाणी आलं; पण तेवढ्यात अचानक त्याच्या नावाचा पुकारा झाला. स्पर्धेचे आयोजक बोलत होते, या धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस एका धावपटूने मिळवले असले, तरी या संपूर्ण क्रीडास्पर्धेमध्ये अव्वल ठरलेला एक खेळाडू म्हणून आज मी वरदचं नाव घोषित करतो. स्पर्धेपेक्षा देखील माणुसकी महत्वाची असते ही एका अतिशय महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला वरदने शिकवली. आयोजकांचे शब्द संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. स्पर्धा हरल्याचं दु:ख वरद विसरला. स्पर्धा जिंकण्याच्या आनंदापेक्षा दुसऱ्याची मदत करण्यातला आनंद मोठा आहे हे आज त्यालाही उमगलं होतं.
तात्पर्य: माणुसकीचा विचार करून एकमेकांना मदत करणे हा सर्वांत मोठा गुण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.
| दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि .... |
खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.
| मैत्री → | दप्तर → | गृहपाठ → | रस्ता |
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.
खालील कथालेखन करा.
रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
एकीचे बळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
ऐकावे जनाचे करावे मनाचे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कष्टाची गोड फळे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रामाणिकपणाचे फळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
बुद्धी आणि ताकदीचा मेळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पळसाला पाने तीनच
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
अति तिथं माती
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज
खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.
मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.
| आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि... |
तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.
तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
| प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
- कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.
