हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

मी फुलवलेली बाग

बागेचे सौंदर्य मनावर जादू करत आहे, असे वाटत होते, कोरोना महामारी काळातील लॉकडाऊन म्हणजे अतिशय कंटाळवाणा काळ होता; पण मला मात्र या काळात आपली आवड जपण्याची नामी संधीच मिळाली. ती आवड प्रत्यक्षात अवतरली ती आमच्या गॅलरीमध्ये फुलवलेल्या बागेच्या रूपात! आजोबांनी पाठिंबा दिला आणि माझी बागकामाची सुरुवात झाली. आमच्या अडगळीच्या सामानात प्लॉस्टिकचे मोठे ट्रे होते. त्यामध्ये माती भरून घेतली. जवळच एक फूलझाडांची नर्सरी आहे. मी जमवलेल्या पैशांतून आजोबांच्या सोबतीने तेथून काही फूलझाडे विकत आणली. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली या रोपांची मी लागवड केली. त्यांना खतपाणी घालणे, त्यांची निगा राखण्याचे काम मला एक विलक्षण आनंद मिळवून देत होते.

बागकामातला माझा उत्साह बघून हळूहळू कुटुंबियांनीही आपले सहकार्य सुरू केले. आई पाणी घालण्याच्या वेळी मदत करू लागली. बाबांनी एक छोटी झारी आणि खुरपे आणून दिले. बागकामासाठी सेंद्रिय खताचा वापर करण्याचा सल्ला दादाने दिला. त्यासाठी आम्ही कोथिंबीर किंवा इतर भाज्यांच्या न वापरलेल्या भागांचा उपयोग खत म्हणून करू लागलो. डाळींचे पाणी, तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी, चहाचा गाळ यांचा वापर खत म्हणून केला. मासे धुतल्यानंतर त्याचे पाणी घातल्याचा चांगलाच परिणाम दिसून आला.

चमेली आणि जुही, गुलाब यांसारख्या अनेक फुलांनी बागेला सुशोभित केले होते. रंगीबेरंगी फुलांचे हास्य फुलताना पाहून आयुष्यातील खऱ्या आनंदाची जाणीव झाली. पुढे भाजीपाला लागवड करण्याची इच्छा निर्माण झाली. आजोबांनी मेथी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो घरच्याघरी कसे पिकवायचे ते सांगितले. मेथी पेरली. कोथिंबिरीसाठी धणे फोडून पेरले. मिरची आणि टोमॅटोच्या बिया टाकून ठेवल्या. थोड्याच दिवसांत मेथीची भाजी छानपैकी तयार झाली. ती मेथीची भाजी काढून आईला दिल्यानंतर आणि त्याची भाजी खाल्यानंतर काय आनंद झाला म्हणून सांगू!

झाडांना पाणी देत ​​होतो. बागेत फुलांचा सुगंध होता तर हृदयात आनंदाचा संचार. मिरची, टोमॅटोची रोपे चांगलीच तयार झाली. मेथी पाठोपाठ आम्ही कोथिंबीर जेवणात वापरली. झेंडूची फुले, गुलाबाची फुले नेहमीच्या पूजेसाठी मिळू लागली. एके दिवशी मिरचीच्या रोपांवर पांढऱ्या रंगाची फुले दिसली. आजोबा म्हणाले, “राजे, तुमच्या बागेत मिरच्या येणार बरं का.” मिरच्यांच्या फुलांपासून मिरच्या तयार होण्याचा प्रवास मी रोज न्याहाळत होतो. आई मध्येच चिडून काय सारखं सारखं झाडांना त्रास देतोस, म्हणून ओरडायची. घरातले सारेच जण माझे आणि माझ्या बागेचे कौतुक करत होते. दादाने त्याच्या सोशल मीडियावर माझ्या बागेचे फोटो टाकल्यावर त्याला खूप 'लाइक्स' आल्या. मला या साऱ्यातून एक वेगळेच समाधान मिळाले. आपण काहीतरी नवनिर्मिती शिकलो अशी भावना निर्माण झाली.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.3: उपयोजित लेखन - निबंधलेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 20.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन | Q इ. ४.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
अध्याय 16.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन ३ | Q इ. ४.

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


नमुना कृती.


नमुना कृती:


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

गप्पा मारण्याचे व्यसन


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फाटक्या पुस्तकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


साधना विद्यालय, धुळे
इयत्ता दहावी - शुभेच्छा समारंभ 
दि. ४ फेब्रुवारी, स. १० वाजता 
अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ
प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे

वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×