Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

Advertisements
उत्तर
मी शाळा बोलतेय...
एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. कंटाळा आला या एकटेपणाचा. काय ही भयाण शांतता. या कोरोनाने तर साऱ्यांनीच पाचावर धारण बसवली आहे. साऱ्यांचेच जीवन धोकादायक झाले आहे. आश्चर्याने काय पाहताय? अरे बाळांनो, मी तुमची लाडकी शाळा बोलतेय... जवळपास एक वर्ष झालं मी बंद आहे. ना घंटेची ठणठण ना तुमचा गोंधळ. सारं कसं उदास. तुम्ही मला विसरणार तर नाही ना? ऑनलाईन शाळेच्या दुनियेत तुमची खरीखुरी शाळा हरवून तर नाही ना जाणार? याची भीती वाटायला लागली मला. मोबाइलवरची कसली रे शाळा. सारं काही आभासी. मी होते, आहे आणि पुढेही असणारच. पोरांनो; पण तुमची मी मनापासून वाट पाहतेय रे! शाळा म्हणजे समाज मंदिर नाही का? समाजातील विविध जातींच्या, धर्मांच्या, गरीब, श्रीमंत साऱ्या विद्यार्थ्यांना मी आपल्यात सामावून घेते. माझ्यासाठी कोणीही हुशार नाही की 'ढ' नाही. मी सगळयांनाच सारखे ज्ञान देते. उगीच का कवी मला 'ज्ञानमंदिर' म्हणतात. समाजात वावरताना तुम्हांला 'माणूस' म्हणून जगण्याचे बाळकडू मीच पाजते.
शाळा मुलांना म्हणाली, खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. या देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी, मोठमोठे उद्योगपती, नेते, डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक, शास्त्रज्ञ, कलाकार, शेतीतज्ज्ञ सारे माझ्याच सावलीत वाढतात. तुमचे नेतृत्वगुण, तुमची धडपडी वृत्ती, वक्तृत्वशैली साऱ्याची सुरुवात माझ्यापासूनच होते. समाजजीवनातील माझे स्थान अढळ आहे, ते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळेच. तुम्हांला कितीही प्रसिद्धी मिळाली तरीही तुम्ही मला कधी विसरत नाहीत. 'ही आवडते मज मनापासूनी शाळा' हे तुमच्या मनाचे भाव ऐकल्यावर धन्यधन्य झाल्यासारखे वाटते.
शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. माझा जीव, की प्राण म्हणजे तुम्ही विद्यार्थी. तुमचा आवाज म्हणजे माझा श्वास. तुमच्याविना सुट्टीचे दिवस कसेतरी कंठणारी ही शाळा आज कोरोनामुळे वर्षभराहून अधिक काळ बंद आहे. माझ्या मन:स्थितीची तुम्हांला कल्पनाही करता येणार नाही. माझा तर जीव् गुदमरतोय अगदी. तुम्हांला जिंकताना, लढताना, आनंदी होताना बघण्याची इच्छा आहे. तुमच्या खोड्या, परीक्षेचं दडपण सारं पुन्हा अनुभवायचं आहे. कित्येक दिवसांत प्रार्थना नाही, की राष्ट्रगीत नाही. शिक्षकांचं रागावून ओरडणं, प्रेमाने समजावणं, कौतुकाची थाप सारं काही बंद आहे. या साऱ्यांसाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे.
माझी लाडकी पिल्लं नुसती माझ्या कुशीत येत नाहीत तर. माझ्यासाठी माझे विद्यार्थी हेच माझे जीवन आहेत. मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी आईचा हात धरून पहिल्यांदा तुम्ही शाळेत येता. रडत रडत येताना तुम्हांला मी पाहते आणि मी मात्र मनात हसत असते; कारण मला माहीत असतं की आता रडणारे तुम्ही मला सोडून जातानाही रडणार आहात. येथे अनेक विद्यार्थी आले, शिकले, मोठे झाले. आपल्याबरोबरच त्यांनी माझे नाव मोठे केले. तुम्हा साऱ्यांचाच मला सार्थ अभिमान आहे. बाळांनो, लवकरच या. पुन्हा नव्या दमाने, भविष्य घडवण्यासाठी मी तयार आहे.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
नमुना कृती.

नमुना कृती:

खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!

‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

