हिंदी

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

मी पुस्तक बोलत आहे...

         “नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना? अहो, मी तुमचा मित्र 'पुस्तकराव' बोलतोय. तसे माझे आणि तुमचे नाते अगदी बालपणापासूनचे! माझ्याद्वारे तुम्ही गाणी, गोष्टी शिकता. तालासुरात कविता म्हणायला व घडाघडा पाठ वाचायलाही शिकता. माझ्यातील रंगीत, बोलकी चित्रे पाहून किती आनंद मिळतो तुम्हांला! खरंच, तुमच्या दिवसाची सुरुवात माझ्या वाचनाने होते, हे पाहून मला खूप आनंद होतो. मला माझ्याजवळ असलेला माहितीचा, ज्ञानाचा खजिना तुम्हांला उलगडवून दाखवता येतो. तुमचा एखादा कंटाळवाणा, थकलेला क्षण माझ्या संगतीने मनोरंजक बनू शकतो. तुम्हांला एखाद्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाताना मी तुमचा वाटाड्या बनू शकतो. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांशी तुमची भेट घालून देण्याचे भाग्य मला लाभते. त्यामुळे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

         झाडापासून कागदनिर्मिती होईपर्यंत, अगदी पुस्तक बांधणी ते पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंतचा हा प्रवास मी अनुभवलेला असतो. हजारो हातांनी मेहनत केलेली असते, मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी! कागदनिर्मिती करणाऱ्या सामान्य मजूर, कारागिरांपासून लेखक, प्रकाशक यांचा माझ्या निर्मितीमागे मोलाचा वाटा असतो. या सर्वांच्या मेहनतीची जाणीव नसल्यामुळेच काही लोक माझा नीट वापर करत नाहीत. कव्हर्स घालणे तर दूरच; पण काही खाता-पिताना माझ्यावर डाग पाडतात. माझी पाने दुमडतात. मला निष्काळजीपणे हाताळल्यामुळे मी फाटतो. काहीजण तर मला उशीसारखे डोक्याखाली घेऊन झोपतात. असे हे बेजबाबदार वागणे मला अजिबात आवडत नाही. अतिशय दु:ख होते.

         मला तुम्हां सर्व मुलांना असे सांगावेसे वाटते, की 'ज्ञानमेव परा शक्ति:'। ज्ञान हीच सर्वोत्तम शक्ती आहे. हे ज्ञान आमच्यात वास करते. त्यामुळे, मला हाताळताना थोडीशी काळजी घेतलीत, तर मला खूप आनंद होईल. मी चांगल्या स्थितीत राहीन व इतरांनाही उपयोगी पडेन.

         सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मीही डिजिटल होत आहे. मला मोबाइलमध्ये, संगणकावर 'इ-बुक'च्या स्वरूपात वाचता येते. माझ्या या काळानुसार बदलत्या रूपाची भुरळ तुमच्या नव्या पिढीला पडत आहे. तुमचा वाचनाचा छंद कायम टिकावा, हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे, तुम्हांला काहीतरी सांगण्याची, तुमच्यासाठी काही करण्याची, तुमच्या जवळ राहण्याची माझी इच्छा पूर्ण होईल आणि आपली मैत्री सदैव टिकून राहील.

         अच्छा, खूप वेळ झाला, अभ्यास करा बरं …“

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2019-2020 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


अश्वमेध सभागृह

– दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या –

– कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन –

दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8

प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे

35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या

वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी.

वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :

'निसर्ग माझा सखा' 


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×