Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
Advertisements
उत्तर
परीक्षाच नसत्या तर
आम्ही मुले वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून शाळेत जातो. तेव्हापासून अभ्यास आणि परीक्षा आमची पाठच सोडत नाही. त्यामुळे ‘परीक्षाच नसली तर’ हा विचार येताच मनात गोड गुदगुल्या होतात. खरोखरच हा परीक्षेचा बागुलबुवा आम्हा मुलांच्या मागे लागला नाही तर जीवन किती सुसह्य होऊन जाईल आमचे. म्हणजे मला शाळेत जायला खूप आवडते. कारण शाळेतच माझे आवडते मित्र आणि मैत्रिणी मला भेटतात. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करायला, खेळायला मला खूप खूप आवडते. माझ्या मनाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर ती टोचणी मी माझ्या मित्रांजवळच व्यक्त करतो. शिवाय शाळेत आम्हाला वेगवेगळे विषय शिकवतात त्यामुळे जगाचे भरपूर ज्ञान आम्हाला मिळते. आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षकही खूप तळमळीने आम्हाला शिकवतात. त्यांना आमच्याबद्दल प्रेम आहे हे आम्हाला जाणवते. मधल्या सुट्टीत खाऊ खायला आणि शाळेच्या सहलींना जायला खूप मज्जा येते. दर वर्षी शाळेत क्रीडास्पर्धा होतात आणि वार्षिक स्नेहसंमेलनही होते. मी ह्या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेतो.
परंतु परीक्षा जवळ आल्या की मात्र आमचा सगळा उत्साह नाहीसा होतो. आमचे विद्यार्थी जीवन अगदी हिरमुसून जाते. शिवाय ह्या परीक्षासुद्धा अगदी पुष्कळ असतात. दर महिन्याची चाचणी परीक्षा, तिमाही, सहामाही, नऊमाही आणि वार्षिक अशाही परीक्षा मागे लागलेल्या असतातच. त्याशिवाय स्पर्धात्मक परीक्षा, अचानक वर्गात घेतलेल्या परीक्षा अशाही परीक्षा असतात. ह्या साऱ्या परीक्षांचा मनावर ताण येतो. घरातील मोठी माणसे तर येताजाता अभ्यासावरून बोलत राहातात. दहावीच्या मुलांना तर जीव नकोसा होऊन जातो ह्या काळात. परीक्षेच्या काळात मनावर ताण येतोच पण खेळायलाही मिळत नाही, सहली, हॉटेलात खाणे, टीव्ही बघणे सगळ्यावरच आफत ओढवते. शिवाय परीक्षेचे निकाल लागले आणि त्यात जर मनासारखे गुण नाही मिळाले तर आईबाबांची बोलणी खावी लागतात. आपला मान कमी होतो. नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागणे म्हणजे तर फारच शरमेची गोष्ट असते.
परंतु परीक्षाच नसल्या तरी चालणार नाही. कारण मग आमच्या ज्ञानाची कसोटी लागणारच कशी? परीक्षाच नसेल तर कायमच सुट्टी असल्यासारखे वाटेल. मग त्या सुट्टीचाही कंटाळाच येईल ना. कारण पुष्कळ अभ्यास करून परीक्षा दिल्यावर त्यानंतर मिळणाऱ्या सुट्टीचा आनंद खराच अवर्णनीय असतो. त्याशिवाय परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर शाबासकी मिळते, त्या आनंदाचे काय? लहानपणी शाळेत दिलेल्या परीक्षा ही खरी तर पुढे जीवनात द्याव्या लागणाऱ्या परीक्षांची पूर्वतयारीच तर असते. त्यामुळे आपल्याला परिश्रम घेण्याची, मेहेनत करण्याची सवय लागते, आपली स्मरणशक्तीही त्यामुळे वाढते. म्हणून मला वाटते की परीक्षा ह्या हव्यातच. हल्ली सरकारने नियम काढला आहे की आठवीपर्यंत परीक्षा घेऊच नयेत. परंतु हा नियमघातक आहे असे मला वाटते. परीक्षा हव्यातच.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
नमुना कृती.

खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

