HSC Commerce (English Medium)
HSC Science (General)
HSC Arts (English Medium)
HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 27th June 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना:
- आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) आनंद अनुभवण्याची निमित्तं - (२)
(य) ............
(र) ............
(२) विधाने पूर्ण करा - (२)
(य) आई-वडील खंतावतात, जेव्हा ............
(र) आपण आनंदाला पारख होतो, जेव्हा ............
|
पैशाशिवाय जो आनंद राहू शकतो, तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाटी तर कितीही पैसे मिळाले, तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या, अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. २ × २ = ४ असा आनंदाचा गुणकार होतो; पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं, तरी गुणाकार शून्यच येणार. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. एखादया ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे; पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला, की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्त्व आहे - ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो, तेच क्षत्र निवडा. स्वत:च्या आवडीचं काम निवडा, केवळ आई-वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई-वडिलांच्या आनंदासाठी हे केलं; पण जेव्हा आई-वडिलांना जाणवतं, की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘एखादया ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगण आहे,’ या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
किंवा
खरा टिकाऊ आनंद मिळविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) लेखकाच्या मते व्यंगचित्राच्या भाषेची वैशिष्ट्ये - (२)
(य) ..........
(र) ..........
(२) फरक लिहा: (२)
(य) आईचं नातं ..........
(र) बाकीची नाती ..........
|
व्यंगचित्रं ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते.’ हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’ विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
किंवा
‘व्यंगचित्रांचे प्रभावीपण’ तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
Chapter:
खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) आकाशाचे कोणतेही दोन गुण लिहा. (२)
(य) ..........
(र) ..........
|
आकाश अलिप्त आहे, निःसंग आहे तसेच मोकळे आहे. ते आपले पंख मिटत नाही. जणू अधिकच पसरते. आकाशाप्रमाणे मोकळे असावे. आत, गाठीचे काही नाही. लपवालपव नाही. छपवा छपव नाही. निःस्वार्थ मनुष्यच हे करू शकतो. कारण त्याला इतरांना वगळून काही मिळवायचे नसते. मोकळेपणा हवा असेल तर अधिकाधिक निःसंग, निःस्वार्थ व्हायला हवे. आकाशाजवळ काही नाही. ते केरकचरा, धूळ-धुरोळा जवळ ठेवीत नाही ; त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तार्यांनाही जवळ घेत नाही. धूळ नको, हिरे-माणकेही नकोत. अशी वृत्ती झाली म्हणजे मोकळेपणा येतो. मग सारे मित्र सर्वांना जवळ घेता येते. आकाशाला आपपर नाही. गरुडाने भरारी मारावी, चिमणीने भुरभुर करावी. सजल मेघाने लोंबावे, निर्जल मेघाने गर्जावे. सर्वांना प्रवेश सर्वांना परवानगी, सर्वांना जवळ घ्यायला अनंत हात सदैव सिद्धच आहेत! आकाशाप्रमाणे मोकळे, व्यापक, निःसंग व्हावे असे मला वाटते. |
(२) निःस्वार्थ मनुष्यच आकाशाप्रमाणे असू शकतो. (२)
कारण ..........
Chapter:
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) समुद्राची संचार स्थाने - (२)
(य) ..........
(र) ..........
(२) समुद्राने केलेल्या दोन मानवी क्रिया - (२)
(य) ..........
(र) ..........
|
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड. |
(३) अभिव्यक्ती: (४)
‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
खालील ओळींचा अर्थ लिहा:
‘रडू नकोस खुळे, ऊठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
Chapter:
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Chapter:
फुलं सोन्याची, झेंडू तोडते बाई
तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते.
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
Chapter:
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:
(य) अधिकाधिक लोकांना आकर्षित करणारी कथाकथनाची लोकप्रिय माध्यमे लिहा. (१)
(र) कथावाचनाला इतर कलांची जोड दिल्यास श्रोत्यांवर होणारा परिणाम लिहा. (१)
| कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात ‘कथाकथन’ क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करीत आहे. या पार्श्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. |
(२) कथाकथनाचे तंत्र अवगत करून घेण्यासाठी आवश्यक असणारे घटक लिहा. (२)
Chapter:
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
Chapter: [3.01] शोध
गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.
Chapter: [3.02] गढी
Advertisements
‘नर्स ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करायची धडपड करते,’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
Chapter:
‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.
Chapter: [3.02] गढी
अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
Chapter: [4.03] अहवाल
वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
Chapter: [4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीची पूर्वतयारी’ या विषयी लिहा:
मुलाखत म्हणजे .......... मुलाखतीचा पाया .......... ज्यांची मुलाखत घ्यावयाची त्यांच्या बद्दलची माहिती ........ मुलाखतीचे उद्दिष्ट ........... मुलाखतीचे माध्यम.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.
Chapter: [4.02] माहितीपत्रक
खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा:
अहवालाचे स्वरूप ............. अहवालाचा प्रारंभ ............. अहवालाचा मध्य ....... अहवालाचा शेवट .............. अहवालाची भाषा.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे बातमीवर आधारित वृत्तलेख सोदाहरण स्पष्ट करा:
घटनाधारिति लेख ............. संदर्भांची माहिती ............. मुद्द्यांचे विश्लेषण ............. तज्ज्ञांचे सहकार्य ............. विषयाला मर्यादा नाही.
Chapter:
Advertisements
माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.
माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.
माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
‘नवरात्र’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.
विभक्ती तत्पुरुष समास
कर्मधारय समास
समाहार द्वंद्व समास
द्विगू समास
Chapter:
‘मी खिडकी हलकेच उघडतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा:
भावे प्रयोग
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
यांपैकी नाही.
Chapter:
भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा:
सगळे खूष होतात.
आरशातल्या स्त्रीने मला विचारले.
हा संदेश मला पोहचवता आला.
मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.
Chapter:
‘आहे ताजमहाल एक जगती
तो तोच त्याच्यापरी’
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
अर्थान्तरन्यास
अतिशयोक्ती
अनन्वय
अपन्हुती
Chapter:
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।
या वाक्यातील उपमेय ओळखा.
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
‘गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा:
गळा तोडणे
गळ्याशी येणे
विश्वासघात करणे
यांपैकी नाही
Chapter:
‘गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
संगणक साक्षरता: काळाची गरज
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
शेतकऱ्याचे मनोगत
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझा आवडता साहित्यिक
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अपघात
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam Marathi with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam.
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
