कवी बा. भ. बोरकर यांनी ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेत आषाढ महिन्यात पडणाऱ्या पावसाचे अत्यंत नादमय आणि ओघवत्या शब्दांत सुंदर चित्रण केले आहे. पावसामुळे निसर्गात घडणारे बदल त्यांनी भावपूर्ण शैलीत मांडले आहेत.
पाऊस थांबल्यानंतर थोडीशी ऊघडीप पडते आणि कोवळे ऊन जमिनीवर पसरते. त्या वेळी शेतात पोषक दुधाने भरलेली कणसे दिसू लागतात. फुलांचे देठ मधुरसाने ओथंबलेले असतात. पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने वातावरण आनंदी होते आणि त्या स्वरांनी गवताच्या पात्यांवरही जणू रोमांच उभे राहिल्यासारखे भासते.
