Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

Advertisements
उत्तर
'मी एस.टी बोलतेय...'
सह्याद्रीच्या कड्याकपारीत तुमच्या सेवेत भेधडक पणे फिरनारी तुमची सर्वांची लाडकी एस.टी बोलतेय. संपला एकदाचा लॉकडाऊन. या डेपोमध्ये उभं राहून अगदी कंटाळा आला होता. चला, मी निघाले माझ्या कामावर. मी कोण म्हणून काय विचारता? मी तुमची सर्वसामान्यांची लाडकी एस.टी बोलतेय. काही जण प्रेमाने मला 'लालपरी' म्हणतात, तर काहीजण 'लालडब्बा' म्हणून चिडवतात; पण तरीही 'वाट पाहीन; पण एस.टी नेच जाईन' असे म्हणत माझीच वाट पाहतात.
साऱ्यांनीच अनुभवलेला लॉकडाऊनचा काळ म्हणजे जणू तुरुंगवासाची शिक्षाच. बाहेरचे जग बघण्याची, फिरण्याची, गावोगावी जाण्याची आवड असलेल्या आम्हांला एकाच जागी उभे राहण्याची वेळ आली. तसे आम्ही खूप संप, बंद, आंदोलने, दंगे पाहिले. तुम्ही फेकलेले दगड झेलले. तुम्ही लावलेल्या आगीत माझ्या बहिणी होरपळल्या; पण आम्ही थांबलो नाही, सलग इतके दिवस एकाच जागी उभे राहण्याची वेळ मात्र या कोरोना प्रादुर्भावामुळे केलेल्या 'लॉकडाऊन' ने आणली.
आम्ही बंद झालो आणि संपूर्ण दळणवळण सेवा ठप्प झाल्या. खेड्यापाड्यांतील गरीब आणि श्रीमंत सगळयांच्या हक्काची एस.टी बंद झाल्याने त्यांचे प्रवासाचे हाल झाले. शहराला आणि खेड्याला जोडणारा दुवा म्हणजे मी; पण लॉकडाऊनमध्ये हे सारेच ठप्प झाले. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सातत्याने धावत असतो. उन्हातान्हातून, पावसापाण्यातून खेडोपाडी अखंडपणे सेवा देणे हेच आमचे काम. ज्या गावातून मी सुटते, त्या गावातील लोक मला 'आमची एस.टी' असं आपुलकीनं म्हणतात, तेव्हा धन्य धन्य वाटते. आपल्या माणसांची भेट घडता त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद मला अभिमानाने फुलवून सोडतो. लोकांना मी अगदी हक्काची वाटते. हे पाहून समाधान मिळते. लोकांच्या जीवनात आपले महत्त्व किती आहे हे जाणवते तेव्हा उगाच मिरवावंसही वाटतं. बर वाटतं मला जेव्हा माझी आतुरतेने वाट बघत प्रवाशी बस स्थानकांवर उभे असतात.
कमी वेळात सोयीचा प्रवास करता यावा म्हणून माझी निवड सगळेच करतात. विद्यार्थ्यांना मासिक पास, ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना तिकीट दरात सवलत, प्रवाशांना सहलीसाठी सवलत अशा एक ना अनेक गोष्टींमुळे जनमाणसांत मी प्रचंड लोकप्रिय आहे. गौरीगणपतीच्या सणाला पार तळकोकणात जाणारे प्रवासी 'आपली लालपरी बरी' असे म्हणून प्रवास करतात तेव्हा खूप मजा येते. शहरे आणि अगदी विरळ वस्तीची खेडी एकमेकांना जोडण्याचे काम मी २४ तास अखंडपणे करत असते.
मानवाचा राग माझ्यावरच निघतो ओ. तुमचा क्षणिक निषेध व्यक्त करण्यासाठी माझ्यावरच दगडफेक केली जाते, माझीच तोडफोड केली जाते, माझीच जाळपोळ केली जाते… का? कशासाठी मी माझ्या कार्यात कधीच कमी पडत नाही.. तरीही तुमचा राग माझ्यावरच का निघतो? या सगळया आपुलकीच्या नात्यामध्ये प्रवाशांबद्दल माझी एक तक्रार आहे. तुम्ही मला आपली म्हणता आणि माझी काळजी घेत नाही, याचे मला वाईट वाटते. शेंगांची टरफले, वेफर्सची पाकिटे, पान खाऊन थुंकणारे आणि उगीचच आपली नावे टाकून माझ्या सीटचा मागचा भाग खराब करणारे यांची मला चीड येते. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आणि आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडणार आहोत. मग आमची काळजी तुम्हीसुद्धा घ्यायला हवी, असे तुम्हाला वाटत नाही का?
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

