हिंदी

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा: सूर्य उगवला नाही तर ........

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

सूर्य उगवला नाही तर ........

एके दिवशी रात्री मला अचानक झोपेतून जाग आली. मला वाटले सकाळ झाली असावी म्हणून मी खिडकी उघडून पाहिली तर काय बाहेर पूर्ण काळोख होता. मी पुन्हा निपचित पडून राहिलो पण झोप मात्र लागता लागणा. त्यामुळे मी खिडकीच्या बाहेर पाहत असताना अचानक माझ्या मनात प्रश्न पडला की जर सूर्य उगवला नाही तर? मी विचार करू लागलो. जर सूर्य उगवला नाही तर खूप मज्जा येईल. सकाळी लवकर उठावे लागणार नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत. रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत. सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल.

सूर्य उगवला नाही तर... दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार नाहीत. सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत. असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील धान्य कसे पिकणार? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? इतक्यात माझ्या डोळ्यांवर सूर्याची किरणे पडली सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला ‘सूर्य उगवला, सूर्य उगवला!’

किती सुंदर कल्पना आहे! सूर्य उगवला नाही तर खरोखरच खूप मजा येईल. सकाळी लवकर उठावे लागणार नाही. शाळेत जायला. बाहेर अंधार असल्यामुळे आई बाहेरची कामे सांगणार नाही. पण खरोखरच सूर्य उगवला नाही तर सकाळ-दुपार-संध्याकाळ नसेल. बाहेर फिरता येणार नाही. सायकल चालवता येणार नाही. मित्राबरोबर खेळता येणार नाही. शाळाही नसेल. म्हणून मित्रही नसतील. सहल नसेल. मग सगळी मजाच निघून जाईल.

खरेच सूर्य नसला तर पाऊस सुद्धा पडणार नाही. वनस्पती नष्ट होणार म्हणून अन्न मिळणार नाही. पाणी मिळणार नाही. मग आपण जगणार कसे? फक्त माणूसच नव्हे तर प्राणी ही मरून जातील. पृथ्वीवर फक्त दगड उरतील! नको नको ही कल्पनासुद्धा नको सूर्य हा हवाच.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

व्यक्तिचित्रणात्मक निबंध

माझा आवडता कलावंत.


खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


नमुना कृती.


नमुना कृती:


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

गप्पा मारण्याचे व्यसन


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फाटक्या पुस्तकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×