Advertisements
Advertisements
Question
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
Advertisements
Solution
आमच्या शेजारी विलास नावाचा माझा एक मित्र आहे. तो इंजिनीअर झाला. त्याला इंग्रजी उत्तम येत होते. त्याला परीक्षा संपताच ताबडतोब नोकरी मिळाली. पगार पण तुलनेने चांगला होता. त्याला ऑफिसला नेण्यासाठी रोज गाडी यायची आणि गाडीतून त्याला घरी पोहोचवले जायचे. घराचे सगळे खूश होते. स्वतः विलाससुद्धा खूश होता. कमतरता फक्त एकाच गोष्टीची होती. त्याची नोकरी रात्रपाळीची होती. सुरुवातीला काही दिवस आनंदात गेले. पण थोड्याच दिवसांत परिणाम दिसू लागले. तो दिवसभर झोपून राहू लागला. त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला. उठला की कंटाळलेल्या, दुर्मुखलेल्या अवस्थेत नुसता बसून राहायचा. कोणत्याही प्रकारचे चैतन्य त्याच्या चेहऱ्यावर दिसेनासे झाले. त्यात आणखी एक वेगळीच भर पडली. ऑफिसात रात्रीच्या पार्टी होऊ लागल्या. त्यामुळे त्याला दारू-सिगरेटचे व्यसन जडले. आईवडिलांच्या तोंडचे पाणीच पळाले. नवीन प्रकारच्या कार्यालयीन सवयीने एक वेगळी जीवनशैली घडत होती. त्या वेगळ्या जीवनशैलीचा एक नमुना झाला. असे विविध नमुने आजूबाजूला दिसत आहेत. आणि शेकडो तरुण या नव्या जीवनशैलीला बळी पडत आहेत, हे चित्र निराशाजनक आणि अतिशयोक्तिपूर्ण वाटणे शक्य आहे. पण हे एका तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवातून मांडलेले चित्र आहे.
अशी भीषण परिस्थिती पाहिली की वाटते आपण नेमके काय कमावले? हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. त्याचे अनेक फायदे असतील. नव्हे आहेतच. पण दुसऱ्या बाजूने घडत असलेली ही पडझड संपूर्ण माणुसकीलाच नष्ट करणारी आहे. नव्या परिस्थितीतून एक वेगळीच मूल्यव्यवस्था निर्माण होत आहे. यात केवळ पैशाला प्राधान्य आहे. पैसा श्रेष्ठ आहे. पैशानेच सर्व काही मिळते. पैसा नसेल तर आपण शून्य आहोत. या त-हेची विचारसरणी आता सार्वत्रिक होत आहे.
माणसामाणसांमध्ये भावनांचे हृदय स्वरूप आता दिसेनासे होऊ लागले आहे. शेजारीपाजारी, मित्रमंडळी यांच्यातील नाते आता उपयोगापुरते शिल्लक राहिले आहे. एक विचित्र गोष्ट घडत आहे. इथे नोकरी करणाऱ्यांना नोकरी सोडण्याचे एवढे स्वातंत्र्य आहे की, वर्षभरात तरुण भराभर नोकरी सोडतात. या परिस्थितीमुळे आपले काम, आपली कंपनी, आपली संस्था यांच्याबद्दल कोणतीही निष्ठा शिल्लक राहिलेली नाही. कोणत्याही मूल्यावर निष्ठा राहिलेली नाही. माणसावर निष्ठा राहिलेली नाही. व्यवस्थेवर सुद्धा निष्ठा राहिलेली नाही. माणूस पालापाचोळ्यासारखा भिरभिरत आहे.
हे मानवी जीवन नव्हे. हा मानवी जीवनाचा -हास आहे. यातून निर्माण झालेल्या ताणांमुळे मानसिक आजार जडत आहेत. अखंड पिढीच्या पिढी जर अशी आजारग्रस्त झाली तर भीषण अवस्था निर्माण होईल. म्हणून नव्या जीवनशैलीत काहीतरी बदल करणे आवश्यक आहे
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
| उषावहिनींचा सल्ल | निशावहिनींचा सल्ल |
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
