Advertisements
Advertisements
Question
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
Advertisements
Solution
बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांची गाणी, कविता या सामान्य दर्जाच्या, जुनाट वळणाच्या असतील, असे कोणाचे मत होऊ शकते. पण त्या तशा नाहीत. त्यांच्या कविता रचनेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक आहेत. तसेच, त्या आशयाच्या दृष्टीनेसुद्धा अत्यंत आधुनिक आहेत. त्यांचे विचार, कल्पना आधुनिक काळातल्याच आहेत. त्यांचे सर्व विचार आजच्या काळातही पूर्णपणे लागू पडतात.।
बहिणाबाईंची प्रत्येक कविता परिपूर्ण आहे. प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट यांत नाट्यात्मकता आहे. ही बाब आधुनिक आहे. कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे, हे दिसून येते. कवितेतला विचार किंवा भावना फापटपसारा न लावता सांगतात. कमीत कमी आणि नेमक्या शब्दांत आपला आशय मांडतात. यासाठी फार मोठे भाषिक आणि वैचारिक कौशल्य लागते. ते बहिणाबाईंकडे पुरेपूर आहे.
आपली कविता लोकांना आवडावी; लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी, यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात, असे दिसत नाही. आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्या सोप्यासोप्या, छोट्याछोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात. हेही त्या मुद्दाम करतात असे नव्हे. बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातील समाजजीवनाशी निर्मळ मनाने समरस झाल्या आहेत. निसर्गाचे दर्शन घेत असताना, घरात, शेतात काम करीत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करतात. त्यामुळे कामातली, निसर्गातली लय त्यांच्या कवितेला मिळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात. हे सर्व आधुनिक आहे.
अहिराणी भाषेचा उपयोग तर बहिणाबाईंच्या कवितेला एक वेगळेच अलंकार चढवतो. त्या भाषेतला सर्व गोडवा, सर्व सौंदर्य त्यांच्या कवितेला मिळते. भाषा अपरिचित म्हणून कविता अपरिचित राहत नाही. त्यांची कविता वाचता वाचता आपोआप कळत जाते; हे त्यांच्या कवितेचे फार मोठे सामर्थ्य आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
| उषावहिनींचा सल्ल | निशावहिनींचा सल्ल |
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
| ज्ञानेंद्रिये | संवेदनांची उदाहरणे |
| (१) डोळे | |
| (२) कान | |
| (३) नाक | |
| (४) त्वचा |
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
| प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
फरक स्पष्ट करा.
| नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
